AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या 230 जागा आल्या तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत : सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं वक्तव्य केलंय. भाजपच्या 230 जागा आल्या तरीही नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असा दावा त्यांनी केलाय. हफिंगटन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पर्यायावरही स्वामींनी वक्तव्य केलं. गडकरींचं नाव पुढे आलं तर हा पर्याय चांगला असेल, कारण […]

भाजपच्या 230 जागा आल्या तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत : सुब्रमण्यम स्वामी
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM
Share

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं वक्तव्य केलंय. भाजपच्या 230 जागा आल्या तरीही नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असा दावा त्यांनी केलाय. हफिंगटन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पर्यायावरही स्वामींनी वक्तव्य केलं. गडकरींचं नाव पुढे आलं तर हा पर्याय चांगला असेल, कारण गडकरी देखील मोदींसारखेच चांगले व्यक्ती आहेत, असं ते म्हणाले.

भाजपला किती जागा मिळू शकतात, असा प्रश्न स्वामींना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “हे सांगणं अत्यंत कठीण आहे, पण मला वाटतं की पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येण्याची शक्यता जास्त आहे. समजा भाजपला 230 ते 220 जागा मिळाल्या आणि इतर मित्रपक्षांना 30 जागा मिळाल्या तर एकूण आकडा 250 पर्यंत जाईल. सरकार बनवण्यासाठी आम्हाला अजून 30 जागांची गरज असेल.”

मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का याबाबतही स्वामींना विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले, “बहुमताचा आकडा गाठण्यासाठी इतर 30-40 जागांचा पाठिंबा देणाऱ्या पक्षांवर हे अवलंबून आहे. जर मित्रपक्षांनी सांगितलं की आम्हाला नरेंद्र मोदी नकोत, तर शक्य होणार नाही. मोदी पुन्हा पंतप्रधान नकोत असं ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अगोदरच सांगितलंय. मायावतींना आम्ही सोबत घेतलं तरी त्यांनी अजून मोदींबाबतची भूमिका जाहीर केलेली नाही.”

मोदींच्या जागी गडकरींच्या नावाचीही चर्चा आहे. यावर स्वामी म्हणाले, असं झालं तर चांगलंच आहे. गडकरी मोदींप्रमाणेच योग्य व्यक्ती आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भाजपला बालाकोट हल्ल्याचा मोठा फायदा झाला. पुलवामा हल्ल्यानंतर भाजपने एअर स्ट्राईक केला नसता तर भाजपला 160 जागात आवरावं लागलं असतं, असं ते म्हणाले.

Follow Us
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....