AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या 230 जागा आल्या तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत : सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं वक्तव्य केलंय. भाजपच्या 230 जागा आल्या तरीही नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असा दावा त्यांनी केलाय. हफिंगटन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पर्यायावरही स्वामींनी वक्तव्य केलं. गडकरींचं नाव पुढे आलं तर हा पर्याय चांगला असेल, कारण […]

भाजपच्या 230 जागा आल्या तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत : सुब्रमण्यम स्वामी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM
Share

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं वक्तव्य केलंय. भाजपच्या 230 जागा आल्या तरीही नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असा दावा त्यांनी केलाय. हफिंगटन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पर्यायावरही स्वामींनी वक्तव्य केलं. गडकरींचं नाव पुढे आलं तर हा पर्याय चांगला असेल, कारण गडकरी देखील मोदींसारखेच चांगले व्यक्ती आहेत, असं ते म्हणाले.

भाजपला किती जागा मिळू शकतात, असा प्रश्न स्वामींना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “हे सांगणं अत्यंत कठीण आहे, पण मला वाटतं की पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येण्याची शक्यता जास्त आहे. समजा भाजपला 230 ते 220 जागा मिळाल्या आणि इतर मित्रपक्षांना 30 जागा मिळाल्या तर एकूण आकडा 250 पर्यंत जाईल. सरकार बनवण्यासाठी आम्हाला अजून 30 जागांची गरज असेल.”

मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का याबाबतही स्वामींना विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले, “बहुमताचा आकडा गाठण्यासाठी इतर 30-40 जागांचा पाठिंबा देणाऱ्या पक्षांवर हे अवलंबून आहे. जर मित्रपक्षांनी सांगितलं की आम्हाला नरेंद्र मोदी नकोत, तर शक्य होणार नाही. मोदी पुन्हा पंतप्रधान नकोत असं ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अगोदरच सांगितलंय. मायावतींना आम्ही सोबत घेतलं तरी त्यांनी अजून मोदींबाबतची भूमिका जाहीर केलेली नाही.”

मोदींच्या जागी गडकरींच्या नावाचीही चर्चा आहे. यावर स्वामी म्हणाले, असं झालं तर चांगलंच आहे. गडकरी मोदींप्रमाणेच योग्य व्यक्ती आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भाजपला बालाकोट हल्ल्याचा मोठा फायदा झाला. पुलवामा हल्ल्यानंतर भाजपने एअर स्ट्राईक केला नसता तर भाजपला 160 जागात आवरावं लागलं असतं, असं ते म्हणाले.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक