AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी-शाहांनी दादागिरीच केली, मग ममतांनी दादागिरी केली तर बिघडलं कुठे? : राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज दादरमधील आंबा महोत्सवाचं उद्घाटन झालं. शिवाजी पार्क येथील वनिता समाज इथे हा आंबा महोत्सव भरवण्यात आला आहे. अभिनेते संजय मोने आणि सुकन्या मोने यांनी आयोजित केलेल्या आम्र महोत्सवाचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्धाटन झालं. यावेळी राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, “मोदींच्या कालच्या […]

मोदी-शाहांनी दादागिरीच केली, मग ममतांनी दादागिरी केली तर बिघडलं कुठे? : राज ठाकरे
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM
Share

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज दादरमधील आंबा महोत्सवाचं उद्घाटन झालं. शिवाजी पार्क येथील वनिता समाज इथे हा आंबा महोत्सव भरवण्यात आला आहे. अभिनेते संजय मोने आणि सुकन्या मोने यांनी आयोजित केलेल्या आम्र महोत्सवाचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्धाटन झालं. यावेळी राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, “मोदींच्या कालच्या पत्रकार परिषदेबद्दल न बोललेलं बरं. कारण तेच (मोदी) काहीच बोलले नाहीत, तर मग आपण काय बोलायचं”

5 वर्षात तुम्ही पत्रकांसमोर कधीच आले नाहीत. पंतप्रधान पत्रकारांना इतकं का घाबरतात, याचं उत्तर त्यांनी स्वत:च द्यावं. असं त्यांनी काय केलंय ज्यामुळे ते एवढं पत्रकारांपासून पळत आहेत, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे करत आहेत ते योग्यच आहे. आजवर या दोघांनी (मोदी-अमित शाह) दादागिरीच केली आहे. मग ममतांनी केली तर बिघडलं कुठे? अमित शाहांना कळू दे दादागिरी काय असते ते. कोलकात्यातील रॅली अर्धी सोडून पळून आले. यांच्या बाबतीत हेच पाहिजे होतं, असं राज ठाकरे म्हणाले.

अमित शाहांच्या रॅलीत हिंसाचार

दरम्यान, चार दिवसांपूर्वी कोलकात्यात अमित शाहांच्या रॅलीत हिंसाचार झाला होता. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. दगडफेक आणि जाळपोळीमुळे कोलकाता धगधगत होतं. तृणमूलने हा हल्ला केल्याचा आरोप अमित शाह यांचा आहे. तर भाजप कार्यकर्त्यांनीच हा राडा घातल्याचा दावा ममता बॅनर्जींनी केला.

मोदी-शाहांची पत्रकार परिषद

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षातील पहिली पत्रकार परिषद शुक्रवारी 17 मे रोजी घेतली. या पत्रकार परिषदेला अमित शाहही उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत मोदींनी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. सर्व प्रश्नांना अमित शाहांनीच उत्तरं दिली. मोदींनी आपलं म्हणणं मांडून केवल पत्रकार परिषदेला हजेरी लावली.

संबंधित बातम्या 

पंतप्रधान मोदींची पहिली पत्रकार परिषद, सर्व प्रश्नांना अमित शाहांची उत्तरं  

तुमचं नशीब चांगलंय की मी शांत बसलीय, नाहीतर…, ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा  

आंध्र 0, तामिळनाडू 0, महाराष्ट्र 20, भाजपसाठी ममतांचा एक्झिट पोल  

भाजप-तृणमूलच्या वादात ज्यांचा पुतळा फोडला, ते ‘ईश्वरचंद्र विद्यासागर’ कोण होते?  

कोलकात्यात अमित शाहांच्या रोड शोमध्ये हिंसाचार 

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...