AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी; पंतप्रधान मोदी यांची देशवासियांना ग्वाही

चार पैकी तीन राज्यांत भाजपाला मोठा विजय मिळाल्याने लोकसभा 2024 चा रस्ता मोकळा झाला असल्याचे म्हटले जात आहे. या विधानसभेच्या निवडणूकांना लोकसभेची प्रिलियम मानली जात होती. सर्व निवडणूक एक्झिट पोलला खोटं ठरवित तीन राज्यात भाजपाचे सरकार येणार हे स्पष्ट झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील पक्षकार्यालयासमोर रात्री भाषण करीत जनतेचे आभार मानले. यावेळी कॉंग्रेसवर त्यांनी तिखट शब्दात टिका केली.

मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी; पंतप्रधान मोदी यांची देशवासियांना ग्वाही
Narendra Modi Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Dec 03, 2023 | 8:53 PM
Share

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : पाच राज्यात विधानसभेच्या निवडणूका झाल्यानंतर आज चार राज्याचे निकाल लागले. त्यात तीन राज्यात भाजपाचा मोठा विजय झाला आहे. ही लोकसभा निवडणूकीची रंगीत तालीम म्हटली जात असल्याने भाजपाने मोठा विजय उत्सव साजरा केला आहे. सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील पक्ष कार्यालयासमोर जनतेला अभिवादन करीत आभार मानले. मोदी यांनी नारी शक्तीसाठी सर्वाधिक काम केल्याचे म्हटले. नारी शक्तीचा विकास हा भाजपाच्या विकास मॉडेलचा स्तंभ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. म्हणूनचे महिलांनी भाजपाला भरपूर आशीवार्द दिला. मी नम्रपणे देशातील महिलांना हेच सांगेन की तुम्हाला जी आश्वासनं दिली. ती शत प्रतिशत पूर्ण करू, ही मोदींची गॅरंटी आहे आणि मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी असेही मोदी यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

भाजपाला सर्वाधिक विधानसभेच्या जागा असलेली तीन मोठी राज्ये मिळाली आहेत. त्यामुळे लोकसभेचा प्रवास सोपा झाला आहे. निवडणूक निकालासंदर्भात आभार मानताना मोदी यांनी आपण दहा वर्षांत केलेल्या कामाचा उल्लेख केला. भाजपाने दहा वर्षांत टॉयलेट, वीज, गॅस, पाणी, बॅंकेत खाती अशा सुविधा दिल्या. इमानदारीने काम केले. भाजप कुटुंब, समाजात महिलांची आर्थिक भागीदारी वाढवण्यासाठी रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी निरंतर काम करत आहे, हे महिला पाहत आहेत. नारी शक्तीचा विकास हा भाजपचा विकास मॉडेलचा स्तंभ आहे. म्हणूनच या निवडणुकीत महिलांनी भाजपाच्या विजयाची जबाबदारी आपल्या हातात घेतली होती. आपल्याला भरपूर आशीर्वाद दिल्याचे मोदी यांनी सांगितले.

तरुणांमध्ये विश्वास वाढत आहे

मोदी पुढे म्हणाले की निवडणूक निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे. देशातील तरुणांना विकास हवा आहे. जिथे सरकारने तरुणांच्या विरोधात काम केलं ती सरकारे सत्तेच्या बाहेर गेली. राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा सत्तेतून बाहेर पडले. ही सर्व सरकारे भ्रष्टाचारात पुढे होती. पेपर लीक आणि भरती घोटाळ्यात मग्न होती. त्याचा परिणाम असा झाला की सत्तेतील पक्ष सरकारमधून बाहेर आहेत. आज देशातील तरुणांमध्ये विश्वास वाढत आहे. भाजपच आपली आकांक्षा समजत असून आपल्यासाठी काम करत आहे, हे तरुणांना वाटतं. भाजपचं सरकार युवकांचं कल्याण पहाणारी आहेत, तरुणांना नवीन संधी देणारी आहेत असं या तरुणांना वाटतं असेही मोदी यावेळी म्हणाले.

काँग्रेसने कधी आदिवासींना विचारलं नाही

कॉंगेसने आदिवासी समाजाला मागे ओढले. त्यामुळे आदिवासी समाज काँग्रेसच्या धोरणामुळे सात दशके मागे राहिला. त्यांना संधी दिली नाही. त्यांची लोकसंख्या दहा कोटी आहे. आज देशातील आदिवासी समाजही आपली मते उघडपणे मांडत आहेत. गुजरात निवडणुकीत आम्ही पाहिलं, ज्या काँग्रेसने कधी आदिवासींना विचारलं नाही त्यांनी काँग्रेसचा सफाया केला. हीच भावना आम्ही एमपी, छत्तीसगड आणि राजस्थानातही पाहिली. या राज्यातील आदिवासी बहुल भागात काँग्रेसचा सुफडा साफ झाला असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आदिवासी समाज आज विकासासाठी आशावादी आहे. ही आशा केवळ आणि केवळ भाजप सरकारच पूर्ण करू शकते. हे त्यांना माहीत आहे. मी प्रत्येक राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्याचं कौतुक करतो. भाजपाबाबतची तुमची निष्ठा, तुमचं समर्पण अतुलनीय आहे. डबल इंजिन सरकारचा मेसेज तुम्ही प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवला. त्याचा फायदा आज होत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

Follow Us
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!