AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ‘काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी…’, संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार

Sanjay Raut : "आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरु होते, मंडप घातला जातो, कार्पेट टाकलं जातं. हा काय प्रकार आहे. सरकार स्थापनेचा दावा नाही, राज्यपालांच निमंत्रण नाही. तरीही आझाद मैदानावर तयारी सुरु आहे. आम्ही असतो एवढा उशीर झाला असता तर राष्ट्रपती राजवट लागली असती" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : 'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...', संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीImage Credit source: ANI
| Updated on: Dec 03, 2024 | 10:09 AM
Share

“सरकार स्थापनेचा गोंधळ सुरु आहे. हे एक प्रकारच अराजक आहे. तीन पक्षांना पूर्ण बहुमत मिळालेलं आहे. त्या बहुमतावर लोकांचा विश्वास नाहीय. अनेक गावागावातून फेरमतदान, मतमोजणीची मागणी होत आहे. गावागावातून लोक रस्त्यावर आले आहेत. माळशिरस मारकंडवाडी गावातील लोकांनी ठरवलं आपण बॅलेटवर मतदान करुन गावाचा कौल काय आहे हे निवडूक आयोगाला दाखवायचा. अशा परिस्थितीत मिळालेल्या बहुमतावर जे सरकार स्थापन करायला निघालेले आहेत, त्यांना विश्वास बसत नाहीय. तो गोंधळलेले आहेत” असं खासदार संजय राऊत म्हणाले.

“राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. दहा दिवसानंतर पूर्ण बहुमत असलेली आघाडी किंवा पक्ष राज्यापालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करत नाही. आपल्यामागे किती आमदार आहेत? याची यादी देत नाही. राज्यपालाने सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केलेलं नाही. भाजपा प्रदेशाध्यक्ष तारीख जाहीर करतायत. आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरु होते, मंडप घातला जातो, कार्पेट टाकलं जातं. हा काय प्रकार आहे. सरकार स्थापनेचा दावा नाही, राज्यपालांच निमंत्रण नाही. तरीही आझाद मैदानावर तयारी सुरु आहे. आम्ही असतो एवढा उशीर झाला असता तर राष्ट्रपती राजवट लागली असती” असं संजय राऊत म्हणाले.

‘असे अपमान सहन करावे लागतील’

आझाद मैदानाची पाहणी करायला भाजपचे नेते गेले होते, त्यावरुन शिवसेनेत नाराजी आहे. या प्रश्नावर राऊत म्हणाले की, “मूळात ती खरी शिवसेना नसल्यामुळे त्यांना असे अपमान सहन करावे लागतील. डुप्लीकेट प्रोडक्ट असल्यामुळे यापुढे असे अपमान सहन करावे लागतील” “अडीच-तीन वर्षांपूर्वी गोजांरत होते, कारण त्यांना मूळ शिवसेना तोडायची होती. महाराष्ट्र कमजोर करायचा होते. म्हणून त्यांनी हे घडवून आणलं. आता त्यांना कळेल भाजप काय आहे? त्यांचं अंतरंग काय आहे?” असं संजय राऊत म्हणाले.

गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी.
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?.
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध..
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध...
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर.
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद.