काँग्रेसची ‘स्वबळा’ची मोर्चेबांधणी सुरू; मुंबईत 100 दिवस प्रत्येक वॉर्डात जनता दरबार

स्वबळावर लढण्याबाबत आम्ही का बोलू नये? असा सवाल मुंबई काँग्रेसने केला आहे. (Mumbai Congress Bhai Jagtap On BMC Election)

काँग्रेसची 'स्वबळा'ची मोर्चेबांधणी सुरू; मुंबईत 100 दिवस प्रत्येक वॉर्डात जनता दरबार
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 3:48 PM

मुंबई : येत्या काळात मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, औरंगाबाद या महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. देशात सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. माझी मुंबई, माझी काँग्रेस हा काँग्रेसचा नारा आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याबाबत आम्ही का बोलू नये? असा सवाल मुंबई काँग्रेसने केला आहे. (Mumbai Congress Bhai Jagtap On BMC Election)

“माझी मुंबई, माझी काँग्रेस’‌ हा काँग्रेसचा नारा आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याबाबत आम्ही का बोलू नये? आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही मुंबईकरांपर्यंत पोहोचू, त्यांच्या समस्या जाणून घेऊ,” अशी प्रतिक्रिया मुंबई कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप (Mumbai Congress President Bhai Jagtap) यांनी दिली.

“मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत. महाविकासआघाडीचे सदस्य आहोत. महाविकासआघाडी कॉमन मिनिमम प्रोगामवर चालते आहे. त्यामुळे महापालिकेचा आणि महाविकासआघाडीचा काहीही संबंध नाही. कारण आम्ही इथे विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे 227 जागांवर लढण्याचा मनसुबा मी पहिल्या दिवशी सांगितला होता. काल पदभार स्विकारला तेव्हा पुनउल्लेख केला,” असेही ते म्हणाले.

प्रत्येक वॉर्डात जनता दरबार

“त्यानुसार आम्ही पुढील 100 दिवसात प्रत्येक वॉर्डात जाऊ. तिथे जनता दरबार करु, लोकांची काम करु, त्या कार्यकर्त्याला विचारु आणि त्यानंतर वरिष्ठांना 227 जागा का लढायच्या हे सांगू,” असेही जगताप यांनी सांगितले.

“भाजपबरोबर सेना सत्तेत असताना मुंबई पालिकेत भाजप विरोधी पक्षात होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना भाकितं करायची सवय आहे. भविष्य पाहून सरकार येत‌ नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही महाविकास आघाडीनं भाजपला जोरदार धक्का दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, असा दावा केला जात आहे.

काँग्रेस हायकमांडकडून नुकतंच भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली.

एकीकडे  शिवसेनेकडून अनेक नेते पुढील सर्व निवडणुका एकत्रित लढण्याची भाषा करत आहे. मात्र दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र शिवसेनेच्या या मताशी सहमत नसल्याचं चित्र आहे. यामुळे महाविकासआघाडीतील तिन्ही घटक पक्ष येत्या महापालिका निवडणुकांमध्ये एकत्रित की स्वबळावर लढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Mumbai Congress Bhai Jagtap On BMC Election)

संबंधित बातम्या : 

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘एकला चलो रे’?

Bhai Jagtap | मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.