AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मन सुन्न झालंय, नितीन देसाईंवर ही वेळ कशामुळे आली? याचा छडा लागला पाहिजे; राज ठाकरे यांची भावनिक पोस्ट

Raj Thackeray on Nitin Desai Death : नितीन देसाईंवर ही वेळ कशामुळे आली? अशी वेळ कोणावरही येऊ नये; मनसे अध्यक्ष राज ठाकरे भावूक

मन सुन्न झालंय, नितीन देसाईंवर ही वेळ कशामुळे आली? याचा छडा लागला पाहिजे; राज ठाकरे यांची भावनिक पोस्ट
| Updated on: Aug 02, 2023 | 3:53 PM
Share

मुंबई | 02 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज आत्महत्या केली. एन डी स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या अशा अचानक एक्झिटमुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय क्षेत्रातूनही देसाई यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो, त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे. नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल?, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

नितीन देसाई यांच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे. असो,कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा. नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली, असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज ठाकरे यांचं ट्विट

मनसे नेते अभिजित पानसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना नितीन देसाई यांच्याशी तीन दिवसांआधी बोलणं झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नितीन देसाई यांचं जाणं अतिशय वेदनादायी आहे. हे दुःख कधीही भरून निघणार नाही. नितीन देसाई हे कला दिग्दर्शनातील मोठं नाव होतं. त्यांची कलाकृती म्हणजे भव्यदिव्यतेचं आणि नाविन्याचं उत्तम उदाहरण होतं. नितीन देसाई आणि माझं संवाद तीन दिवसापूर्वीच बोलणं झालं होतं. लवकरच भेटलं पाहिजे, असं आम्ही म्हणालो. मुंबईला भेटायचं की पुण्याला यावरही आम्ही चर्चा केली, असं अभिजीत पानसे म्हणालेत.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.