AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांच्या आत्मचरित्रातील ‘त्या’ घटनाक्रमावर उद्धव ठाकरे यांचं परखड भाष्य; म्हणाले…

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील निर्णय आणि शरद पवार यांच्या आत्मचरित्रातील उल्लेख; उद्धव ठाकरे म्हणाले...

शरद पवार यांच्या आत्मचरित्रातील 'त्या' घटनाक्रमावर उद्धव ठाकरे यांचं परखड भाष्य; म्हणाले...
| Updated on: May 04, 2023 | 3:35 PM
Share

मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. उद्धव ठाकरे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. “प्रत्येक पक्षाने अंतर्गत काय करावं, याचा अधिकार त्यांना असतो. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. त्यांचा निर्णय झाल्यावर काय बोलायचं ते बोलू, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

लोक माझे सांगाती हे शरद पवार यांचं आत्मचरित्र आणि त्यातील घटनांवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलंय.”कुणी काय लिहावं याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मी मुख्यमंत्री म्हणून काय काम केलं हे जगजाहीर आहे. माझी मतं ठाम आहेत. माझ्या मतांवर मी ठाम आहे. मला व्यक्तींचा किंवा मोदींचा पराभव करण्यासाठी नाहीतर वृत्तीचा पराभव करायचा आहे. माझ्याकडून महाविकास आघाडीला कोणतेही तडे जाणार नाहीत, असंही उद्धव ठाकरे यांनी ,स्पष्ट केलं आहे.

रिजीजू आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष काल भेटले. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली माहिती नाही. कोर्टाचा निकाल येणार आहे. पवारसाहेबांशी माझं अजून बोलणं झालेलं नाही. त्यांचं सर्व होऊद्या मग सविस्तर बोलू, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

वज्रमूठ सभा आणि नियोजन

आम्ही सभेचा कार्यक्रम ठरवला होता. या सभा घेणं विचित्र वाटायला लागलं आहे. दुपारच्या वेळी ऊन खूप असतं. म्हणून या सभा मेनंतर घ्यायचा विचार सुरु आहे. पण माझी महाडची सभा होणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटकमध्ये सध्या विधानसभा निवडणूक होतेय. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. कर्नाटक येथे बजरंग दलाचा विषय काढला गेलाय. पंतप्रधान बोलले आहेत की, बजरंग बली की जय असं म्हणून मतदान करा. मग आता निवडणुक आयोगाने बदल केले आहेत का? बाळासाहेब ठाकरे यांचं मतदान रद्द केलं होतं. कर्नाटकातील मराठी लोकांना आवाहन करतो की, तुम्ही जय भवानी जय शिवाजी म्हणून मतदान करा. तिथल्या मतदारांनी मराठी एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मी बारसूला जातोय पण कुणाती हिंमत बघायला जात नाहीये. मी लोकांना भेटायला जातो आहे. मी होतो तेव्हा केंद्रातून बोललं गेलं की हा प्रकल्प चांगला आहे. रिफायनरीमुळे प्रदूषण मान्य नाही. चांगले प्रकल्प गुजरातकडे गेले. प्रकल्प चांगला असेल तर लोकांसमोर सादरीकरण करा. लोकांच्या डोक्यावर बंदूक ठेवून परवानगी घेताय. कोणाच्या बाजू घेऊन येताय त्या जमिनी उपऱ्यांनी विकत घेतल्या आहेत, असंही ठाकरे म्हणालेत.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...