AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणूक : 3 सदस्यीय प्रभाग रचनेचा अध्यादेश राज्यपालांकडे, काँग्रेस नेत्यांचा मात्र 2 सदस्यीय प्रभाग रचनेवर भर!

3 सदस्यीय प्रभाग रचनेच्या विरोधात राहिलेली काँग्रेस अद्यापही 2 सदस्यीय प्रभाग रचनेवर अडून असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारनं महापालिका निवडणुकीत 2 सदस्यीय प्रभाग रचनेचा विचार करावा असं म्हटलंय.

महापालिका निवडणूक : 3 सदस्यीय प्रभाग रचनेचा अध्यादेश राज्यपालांकडे, काँग्रेस नेत्यांचा मात्र 2 सदस्यीय प्रभाग रचनेवर भर!
पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 3:57 PM
Share

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 सदस्यी प्रभाग रचनेचा ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर त्याबाबतचा अध्यादेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, 3 सदस्यीय प्रभाग रचनेच्या विरोधात राहिलेली काँग्रेस अद्यापही 2 सदस्यीय प्रभाग रचनेवर अडून असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारनं महापालिका निवडणुकीत 2 सदस्यीय प्रभाग रचनेचा विचार करावा असं म्हटलंय. पृथ्वीराज चव्हाण आज पुण्यात बोलत होते. (2 or 4 member ward structure suitable for municipal elections – Prithviraj Chavan)

महापालिका निवडणुकीसाठी 2 किंवा 4 चा प्रभाग असावा ही माझी वैयक्तीक भूमिका आहे. मात्र, काँग्रेस कार्यकारिणीत दोनचा प्रभाग असावा असा ठराव ढाला. राज्यात माहाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे तडजोडीसाठी तीनचा प्रभाग केला असावा. असं असलं तरी महापालिका निवडणुकीत दोनचा प्रभाग करण्यासंदर्भात विचार कारावा, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. ज्यावेळी काँग्रेसनं एक सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला होता. तेव्हा मी बोललो की 2 किवां 4 चा प्रभाग करा. कारण चारचा प्रभाग असेल तर दोन महिला आणि दोन पुरुषांना संधी मिळू शकते. मात्र, पक्षानं भूमिका घेतली आहे. ती चूक आपणच केलेली आपण दुरुस्त करतोय. काहींनी मान्य केलं मात्र काही जणांनी तडजोड करण्यासाठी तीनचा प्रभाग केला, असं गडकरी म्हणाले.

आशिष शेलारांना टोला

भाजप नेत्यांकडून मध्यावधी निवडणुकीची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी तसे संकेत दिले होते. त्याबाबत बोलताना त्यांनी अपेक्षा करत राहणं. याशिवाय त्यांना दुसरं काही करता येणार नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे. मध्यावधी निवडणुकांची गरज नाही. केवळ आशावादावर वक्तव्य करणं त्यांनी करत राहावं, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावलाय.

3 सदस्यीय प्रभाग रचनेचा अध्यादेश राज्यपालांकडे

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धतीचा महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला निर्णय कायम असणार आहे. कारण, तसा अध्यादेश आज महाविकास आघाडी सरकारकडून जारी करण्यात आला आहे. हा अध्यादेश आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला आहे.

काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत 2 सदस्यीय प्रभाग रचनेचा ठराव

मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. मात्र, या प्रभाग रचनेला काँग्रेसनं विरोध केलाय. आज काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या कार्यकारिणी बैठकीत आता सर्व महापालिकांसाठी 2 सदस्यीय प्रभाग रचना असावी असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव आता राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे महापालिका प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

इतर बातम्या :

Photo : शरद पवार आमदार निलेश लंकेंच्या घरी, आई-वडिलांची विचारपूस; लंके कुटुंब भारावलं

उद्धव ठाकरेंची शिर्डीत नवं शहर वसवण्याची घोषणा, गडकरी म्हणतात, उत्तम निर्णय!

2 or 4 member ward structure suitable for municipal elections – Prithviraj Chavan

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.