AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदार म्हणून आम्हाला काही किंमत आहे का?, नानांच्या थेट प्रश्नांनी शिंदे-फडणवीसांना घाम फोडला…

नाना पाटेकरांनी फडणवीस-शिंदेंची खास मुलाखत घेतली. पाहा...

मतदार म्हणून आम्हाला काही किंमत आहे का?, नानांच्या थेट प्रश्नांनी शिंदे-फडणवीसांना घाम फोडला...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 12, 2022 | 10:53 AM
Share

मुंबई : नाना पाटेकर (Nana Patekar) बिंधास आणि परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक सामाजिक प्रश्नांवर ते ठामपणे बोलताना दिसतात. नाना पाटेकर यांनी याच आपल्या परखड शैलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न शिंदे-फडणवीसांना विचारले. लोकमत वृत्तपत्र आयोजित ‘लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात’ ही मुलाखत पार पडली.

नानांनी या मुलाखतीच्या सुरुवातीलाच एक प्रश्न विचारला. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस दोघेही बुचकळ्यात पडले. मतदार म्हणून आमच्या मताला काही किंमत आहे का?, असा प्रश्न नाना पाटेकरांनी विचारला. त्यानंतर शिंदे-फडणवीस दोघेही हसले. फडणवीसांनी जरा सावरत आपलं उत्तर दिलं. आमची किंमत तुमच्या भरोश्यावर ठरते. त्यामुळे तुमची किंमत कमी झाली तर आमची किंमत कशी राहील?, असं फडणवीस म्हणाले.

एकदा मतदान केल्यानंतर पुढची पाच वर्षे आम्ही गणतीत नसतो. आम्ही सर्वासामान्य लोक मतदान करतो. कुणा पक्षाला बहुमत देतो. काही कामं होण्याची अपेक्षा असते. ते काम तुम्ही केलं नाही. तर आम्ही काय करायचं? पाच वर्षानंतर जो काही निर्णय घ्यायचा तो घेऊच पण त्या आधी आम्ही काय करायचं?, असा प्रश्न नानांनी विचारला.

नाना पाटेकरांच्या या प्रश्नाला मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलं. 2019 ला जनतेच्या मताला डावललं गेलं. तीच चूक सुधारण्यासाठी तीन महिन्यापूर्वी हे बदल झाले.

लगोलग नानांनी पुढचा प्रश्न केला. या सगळ्या बदलाला अडीच वर्षे का लागली? या प्रश्नावर शिंदे म्हणाले, कोणतीही गोष्ट घडायला काळ-वेळ पाहिजे ना… मध्यंतरी कोरोना होता त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला नाही. शिंदेंच्या या उत्तराला जोडूनच फडणवीस म्हणाले, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालत नाही. त्यामुळे कोरोना संपताच आम्ही प्रत्यक्ष भेटून हा निर्णय घेतला. एकत्रित आलो. फिजिकल सरकार स्थापन केलं.

नाना पाटकरेंनी या मुलाखती दरम्यान अनेक असे प्रश्न विचारले ज्याने फडणवीस आणि शिंदे यांनाही उत्तरं देताना दोनदा विचार करावा लागला.

Follow Us
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
'मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा'
मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
मुंबईतील रिक्षा, टॅक्सी चालकांची मराठी सक्ती विरोधात जनहित याचिका
मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव
पालिकेतील चुकीच्या निर्णयांवर अमित साटम यांचा इशारा
अमित साटम यांची मुंबई महापौर रितू तावडे आणि पालिका अधिकाऱ्यांना सक्त ताकीद