AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Andheri East by-poll | शिवसेना उद्धव गटातील उमेदवार ऋतुजा लटके यांना कोण करतंय आपल्या पक्षाकडे खेचण्याचा प्रयत्न?

ठाकरे गटाने या निवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र लटके यांनाच आपल्याकडे खेचण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Andheri East by-poll | शिवसेना उद्धव गटातील उमेदवार ऋतुजा लटके यांना कोण करतंय आपल्या पक्षाकडे खेचण्याचा प्रयत्न?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2022 | 9:53 AM
Share

गिरीश गायकवाड, मुंबईः पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता अंधेरी पोट निवडणुकीतील उमेदवारही गमावणार का अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. असं घडलं तर उद्धव ठाकरेंसाठी मोठं संकट उभं राहणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची (Andheri East By poll) पोटनिवडणूक ही आगामी मुंबई पालिकेची ट्रेलरच आहे. त्यामुळे शिंदे गट, भाजपा आणि उद्धव ठाकरे गट या तिघांसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. शिवसेनेने  (Shivsena)जाहीर केलेल्या उमेदवारालाच खेचण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  ठाकरे गटाने या निवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र लटके यांनाच आपल्याकडे खेचण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात ऋतुजा लटके यांना आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती समोर आली आहे. आपला पक्ष आणि भाजप युतीची उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची उच्चपदस्थ सूत्रांची माहीती आहे.

शिवसेना आमदार रमेश लटके यांचं मे 2022 मध्ये निधन झालं होतं. त्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. येत्या नोव्हेंबर महिन्यात इथे पोटनिवडणूक होत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने ही सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची लढत ठरणार आहे.

पाहा व्हिडिओ-

शिवसेनेने महाविकास आघाडीअंतर्गत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपतर्फे मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. अद्याप त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

त्याामुळेच शिवसेनेला मिळत असलेल्या सहानुभूतीला काटशाह देण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. भाजप नेते मुरजी पटेल यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी काम सुरू केले आहे. तरीही अद्यापअधिकृत घोषणा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आत्ता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.