AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, ही भाजपची भूमिका, नाना पटोलेंची टीका, राज्यपाल भाजपची बी टीम?

विधीमंडळात केलेल्या नियम घटनाबाह्य असल्याचा आक्षेप राज्यपालांनी नोंदवला होता. मात्र हे नियम कसे बरोबर आहेत, हे त्यांना पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, ही भाजपची भूमिका, नाना पटोलेंची टीका, राज्यपाल भाजपची बी टीम?
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Dec 27, 2021 | 5:12 PM
Share

मुंबई : विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, अशी भाजपची (BJP) भूमिका असल्याचा टोला काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लगावला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर (Cabinet Meeting) आता पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोशारी (Bhagat Singh Koshyari) पत्र पाठवण्यात आलं असल्याची माहिती नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

भाजपवर घणाघात!

काँग्रेस नेत्यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना आज पुन्हा पत्र पाठवण्यात आलं आहे. यावर अजूनतरी राज्यपालांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय. दरम्यान, जर राज्यपालांची पत्रावर प्रतिक्रिया आली नाही, तर संविधानिक पद्धतीनं जे काही आम्हाला करता येणं शक्य आहे, ते सगळंकाही आम्ही करु, असंही नाना पटोले यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे राज्यपालांच्या आडून विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, अशी भाजपची भूमिक असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनेच होईल आणि उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस असून अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय.

नाना पटोले यांनी म्हटलंय की,…

नियम बदलण्याचे अधिकार विधिमंडळाला आहेत, त्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे नियम बदल करण्यात आले आहेत. आवाजी मतदानाने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परंपरा लोकसभेतही आहे तीच प्रक्रिया महाराष्ट्राने स्विकारलेली आहे. इतर राज्यातही तीच परंपरा पाळली जाते. महाराष्ट्रातही विधान परिषद सभापतींची निवडणूक आवाजी पद्धतीनेच होते. त्यामुळे विधिमंडळाने घेतलेला निर्णय घटनाबाह्य नसून तसे पत्र राज्यपालांना पाठवले जाईल.

राज्यपालांचं काय म्हणणंय?

जे नियम विधानसभा चालवण्यासाठी लागतात, त्यानुसारच विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी सर्व कार्यवाही केली जात असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान, विधीमंडळात केलेल्या नियम घटनाबाह्य असल्याचा आक्षेप राज्यपालांनी नोंदवला होता. मात्र हे नियम कसे बरोबर आहेत, हे त्यांना पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राज्यपालांनी विधानसभेच्या कामकाजात सरकारला सहकार्य करावी, अशी विनंती देखील नाना पटोले यांनी यावेळी केली.

कॅबिनेट बैठकीनंतर पुन्हा पत्र

कॅबिनेट बैठकीनंतर राज्यपालांना पुन्हा पत्र पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहितीही नाना पटोले यांनी यावेळी दिली. यासोबत सगळ्या घटनात्मक प्रक्रिया पाहून उद्या चित्र स्पष्ट होईल, असंही त्यांनी म्हटलंय. घटनादुरुस्तीमध्ये आवाजी मतदानाची प्रक्रियाच वापरली जाते. विधानपरिषदेतची सभापतींची निवड आवाजी मतदानंच केली जाते, असंही नाना पटोले यांनी यावेळी नमूद केलंय. दरम्यान, आता उद्या नेमकं विधानसभेला अध्यक्ष मिळतो का, याकडे संपूर्ण राज्याची नजर लागली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा होता. मात्र विधानसभा अध्यक्षपदासाठी नियम बदलण्यात आले आणि ही प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारला कळवलं. त्यामुळे आघाडीला मोठा धक्का बसला असून अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. उद्या बाबत अधिक चित्र स्पष्ट होईल, अशा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केलाय.

विधानसभा अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्रं पाठवून उत्तर दिलं होतं. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियम बदलची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा उल्लेख राज्यपालांनी पत्रात केला होता. त्यामुळे उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही याबाबतची साशंकता निर्माण झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा राज्यपालांना पत्र लिहून राज्य सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

इतर राजकीय बातम्या –

पाच राज्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबतचा सस्पेन्स कायम; निवडणूक आयोगाने आरोग्य विभागाकडून मागवला अहवाल

त्यावेळेस फडणवीसांनी किती बिस्किटं खायला घातली होती, जाधवांच्या सवालावर पुन्हा विधानसभेत गदारोळ

VIDEO: जसे तुमच्यासाठी मोदी, तसे आमच्यासाठी आदित्य ठाकरे, सुहास कांदे, सुनील प्रभू, भास्कर जाधव आक्रमक, नितेश राणे प्रकरण तापलं

तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव, विधानसभेत पुन्हा गदारोळ, जाधवांचे भाजपला खडे सवाल

Follow Us
श्रेयस अय्यरला कर्णधार पद तर वैभव सुर्यवंशीची मोठी झेप, अनेक नवीन...
Team India T20 List  | श्रेयस अय्यरला कर्णधार पद तर वैभव सुर्यवंशीची मोठी झेप, अनेक नवीन चेहऱ्यांना संधी.... सविस्तर माहिती
भाजपला सर्वात मोठा धक्का, अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर 15 पदाधिकारी
भाजपला सर्वात मोठा धक्का, अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर 15 पदाधिकाऱ्यांसह अनेकांचा पक्षाला रामराम...
अजित पवारांच्या राष्ट्रावादीसाठी उमेदवार मागे घेतला? सुप्रिया सुळेंचं
अजित पवारांच्या राष्ट्रावादीसाठी उमेदवार मागे घेतला? सुप्रिया सुळेंचं थेट उत्तर, म्हणाल्या आता...
आपण कुणाचे वारस आहोत, याचं स्मरण करा; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Raj Thackeray | आपण कुणाचे वारस आहोत, याचं स्मरण करा; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
याची देही, याची डोळा... ऐसा देखिला अलौकिक सोहळा! रायगडावर.....
याची देही, याची डोळा... ऐसा देखिला अलौकिक सोहळा! रायगडावर शिवराज्याभिषेकासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी
भुजबळ की आणखी कोणी..? राज्यसभा निवडणुकीत धक्कातंत्र होणार? राष्ट्रवादी
भुजबळ की आणखी कोणी..? राज्यसभा निवडणुकीत धक्कातंत्र होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष
आपलीच माणसं पैसे मागतायेत मग... विजय वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट,
आपलीच माणसं पैसे मागतायेत मग... विजय वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट, थेटच सांगितलं उमेदवाराच्या माघारीचं राजकारण
एकनाथ शिंदे स्वप्नात सुद्धा बॅगा बघतात, आम्ही तर फाटकी लोकं
Sanjay Raut UNCUT | एकनाथ शिंदे स्वप्नात सुद्धा बॅगा बघतात, आम्ही तर फाटकी लोकं, म्हणत संजय राऊतांचा पलटवार
जोपर्यंत बॅलेट पेपरवर... संजय राऊतांच्या त्या विधानाची सर्वत्र चर्चा,
जोपर्यंत बॅलेट पेपरवर... संजय राऊतांच्या त्या विधानाची सर्वत्र चर्चा, राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? बडा नेता ACB च्या रडारवर!
Shivsena ubt | ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? बडा नेता ACB च्या रडारवर! मालमत्तेच्या चौकशीने खळबळ