राज्यात कुणाला किती जागा? नारायण राणेंची भविष्यवाणी

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणूक प्रचाराचा ज्वर चढलेला असतानाच आता कुणाला किती जागा मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सर्व्हे येत आहेत. अशातच नारायण राणेंनीही भविष्यवाणी केली आहे. लोकसभा निवडणूक निकालाबद्दल भविष्यवाणी करताना राणे म्हणाले, ‘महाराष्ट्रात युतीला 20 ते 22 जागा मिळतील. यात शिवसेनेला 9 ते 10, तर भाजपला 12 जागांवर विजय मिळेल. […]

राज्यात कुणाला किती जागा? नारायण राणेंची भविष्यवाणी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणूक प्रचाराचा ज्वर चढलेला असतानाच आता कुणाला किती जागा मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सर्व्हे येत आहेत. अशातच नारायण राणेंनीही भविष्यवाणी केली आहे.

लोकसभा निवडणूक निकालाबद्दल भविष्यवाणी करताना राणे म्हणाले, ‘महाराष्ट्रात युतीला 20 ते 22 जागा मिळतील. यात शिवसेनेला 9 ते 10, तर भाजपला 12 जागांवर विजय मिळेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला 9 आणि काँग्रेसला 9 च्या आसपास जागा मिळतील.’ मुलगा निलेश राणेंच्या निवडणूक निकालावर भाकित करताना नारायण राणेंनी निलेश राणेंचा 60 हजार मतांनी विजयी होईल, असा दावा केला आहे. आता त्यांची ही राजकीय भविष्यवाणी किती खरी ठरते ते 23 मे रोजी निकालानंतरच स्पष्ट होईल.

उद्धव ठाकरे विकासावर काहीच बोलले नाही, राणेंना कसे ठेचायचा याचा उपदेश करुन गेले

निलेश राणेंना भरघोस मतांनी निवडून द्या. आम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवू, असे आश्वासन देत नारायण राणेंनी ‘हा माझा शब्द आहे’ असेही म्हटले. यावेळी राणेंनी सिंधुदुर्गात 1990 पासून जो विकास केला, तो विकास आम्ही प्रचारात जनतेसमोर ठेवल्याचेही सांगितले. राणे म्हणाले, ‘मी मंत्री आणि पालकमंत्री असताना या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात जवळजवळ सर्व आमदार शिवसेनेचे असताना त्यांनी या 5 वर्षात काय विकास केला? येथे प्रचाराला आलेले उद्धव ठाकरे कोणत्याही विकासाच्या मुद्द्यावर बोलले नाहीत. ते फक्त राणेंना कसे मारायचे, कसे ठेचायचे याचा उपदेश करुन गेले.’

यावेळी राणेंनी शिवसेनेला कोणतेही आर्थिक धोरण नाही, नितीमत्ता नाही, असेही टीकास्त्र सोडले. तसेच फक्त जाती-जातीत भांडणे लावणे एवढेच शिवसेनेचे काम असल्याचाही आरोप त्यांनी केला. दीपक केसरकरांवर टीका करताना राणे म्हणाले, ‘या जिल्ह्याला मिळालेले पालकमंत्री निष्क्रिय आहेत. ते फक्त खोटे बोलतात.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.