AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘स्वत:च्या जेवणाचा खर्चही केंद्र सरकारकडून मागतील’, नारायण राणेंचा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना टोला

केंद्राकडून मदत मागण्याच्या मुद्द्यावरुन नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर मिश्किल टिप्पणी केली आहे (Narayan Rane slams Maha Vikas Aghadi ministers).

'स्वत:च्या जेवणाचा खर्चही केंद्र सरकारकडून मागतील', नारायण राणेंचा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना टोला
| Updated on: Nov 18, 2020 | 4:29 PM
Share

मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांनी ट्विटरवर पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. अतिवृष्टीची झळ सोसणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडून होत आहे. राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (18 नोव्हेंबर) नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना राज्य सरकारने केंद्राला शेतकऱ्यांना मदतीसाठी तीन पत्र पाठवल्याची माहिती दिली. दरम्यान, केंद्राकडून मदत मागण्याच्या मुद्द्यावरुन नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर मिश्किल टिप्पणी केली आहे (Narayan Rane slams Maha Vikas Aghadi ministers).

“राज्य सरकारचा प्रत्येक मंत्री केंद्र सरकारकडे आर्थिक मदत मागतोय आणि मदत मिळाली नाही तर टीका करत आहे. थोडक्यात या सरकारची अवस्था ‘नाचता येईना आंगण वाकडे’ अशी झालीये. आगामी काळात हेच मंत्री स्वतःच्या जेवणाचा खर्चही केंद्राने द्यावा, अशी मागणी करतील”, असा टोला नारायण राणे यांनी लगावला (Narayan Rane slams Maha Vikas Aghadi ministers).

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

“अतिवृष्टीची झळ सोसणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारला तीनवेळा पत्र लिहिले. केंद्र सरकारने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पथक पाठवा, अशी विनंती पत्राद्वारे केली. पण भाजपवाले म्हणतात केंद्राकडे मदतीचा प्रस्तावच आला नाही. त्यामुळे आम्ही आणखी एक पत्र केंद्राला पाठवणार आहोत. भाजप लोकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहे. शेतकऱ्यांची मतं मिळाली म्हणून तुम्ही केंद्रात आहात. मात्र त्यांनाच मदत दिली जात नाही “, असं विजय वडेट्टीवर म्हणाले होते.

महाराष्ट्रावर सगळ्यात मोठं संकट असताना केंद्र सरकार राज्यासोबत दुजाभाव करत असल्याची टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (18 नोव्हेंबर) केली आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजपला मते दिली नाहीत का? मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे (bjp) खासदार राज्यात निवडून आले. राज्यातही जनतेनं त्यांचे 105 आमदार निवडून दिले. पण तरीही भाजपने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे धोरण अवलंबल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

हेही वाचा :

ऊर्जा मंत्री म्हणाले वीजबिल भरावेच लागेल, आता वडेट्टीवार म्हणतात, लोकांच्या भावना तीव्र, मंत्रिमंडळात चर्चा करु

पुणे पदवीधर निवडणूक स्पेशल रिपोर्ट : दोन ‘पाटील’ प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.