AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची युती का तुटली?, असदुद्दीन औवसी यांनी नाशिकमध्ये सांगितलं…

प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमची युती का तुटली?, हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहे. याच उत्तर असदुद्दीन औवसी यांनी दिलंय. पाहा काय म्हणाले...

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची युती का तुटली?, असदुद्दीन औवसी यांनी नाशिकमध्ये सांगितलं...
| Updated on: Jan 05, 2023 | 12:10 PM
Share

नाशिक : उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असं म्हणत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने (MIM) युती केली. पण काही दिवसांआधी ही युती तुटली. पण ही युती नेमकी का तुटली याबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार चर्चा होत असते. त्यावर आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी भाष्य केलंय.

युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांचा होता. त्यांच्या या निर्णयाचा मी कालही आदर करत होतो. आजही करतो अन् पुढेही करत राहील. वंचित समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता. पण आंबेडकर या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावर मी काय बोलू शकतो? आमच्यासोबतची युती का तुटली ती मोठी गोष्ट आहे. ती मी आता कसं सांगू? योग्य वेळी त्यावर बोलेल, असं असदुद्दीन ओवैसी म्हणालेत.

लव्ह जिहाद विरोधी कायद्यावरही ओवैसी बोललेत. भारताच्या संविधानानूसार आपल्या आवडीनुसार लग्न करू शकतात. जिथे जिथे भाजप सत्तेत आहे तिथे तिथे हा बेकायदेशीर कायदा बनवण्यात आला आहे, असं म्हणत औवैसी यांनी भाजपवर टीका केली आहे.

लव्ह जिहाद म्हणतात पण भाजपमध्ये असे किती लोकं आहेत की त्यांनी अशी लग्न केली आहेत. कोणी प्रेम करतंय तर तुम्हाला त्रास काय ? प्रत्येक प्रश्नाला जातीयवादी नजरेतून बघणं योग्य नाही. लव्ह जिहाद कायदा तुम्ही सिद्ध कसा करणार ? धर्मपरिवर्तनबाबत जुना कायदा आहे. ज्यांना जे आवडतंय ते करूद्या. आपल्याकडे बेरोजगारी, महागाई आणि इतर खूप मुद्दे आहेत, त्यावर बोला, असं औवैसी म्हणालेत.

अहमदनगरचं नामांतर करण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आलाय. त्यावर विचारलं असता, तरूणांच्या हाताला काम द्या. नोकरीच्या संधी वाढवा. महागाई कमी करा. तुम्हाला फक्त नावाचं पडलंय. नामांतरापेक्षा कामाच्या गोष्टींवर बोला, असं ओवैसी म्हणालेत.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर टीका केली जातेय. त्यावर विचारलं असता ओवैसी यांनी उत्तर देणं टाळलं. याविषयी अजितदादांनाच विचारा, असं ते म्हणालेत.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा...
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा....
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला.
मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र..
मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र...
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र.
मतदारांवर दबाव आणण्यासाठी... बंगाल निवडणुकीबाबत राऊतांचं मोठं विधान
मतदारांवर दबाव आणण्यासाठी... बंगाल निवडणुकीबाबत राऊतांचं मोठं विधान.
विदर्भ होरपळला; अमरावतीत 46°C, सात वर्षांचा विक्रम मोडला
विदर्भ होरपळला; अमरावतीत 46°C, सात वर्षांचा विक्रम मोडला.
मराठी सक्तीवरून मुंबईत राजकारण तापलं; मुंडेंचा मराठी माणसालाच इशारा?
मराठी सक्तीवरून मुंबईत राजकारण तापलं; मुंडेंचा मराठी माणसालाच इशारा?.
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स.