AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, राष्ट्रवादीला 40 तर शिवसेनेला…

विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांनतर आता सर्वांचे लक्ष नवी मुंबई महापालिका निवडणुकांकडे (Navi Mumbai municipal corporation election) लागलं आहे.

नवी मुंबईत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, राष्ट्रवादीला 40 तर शिवसेनेला...
| Edited By: | Updated on: Jan 09, 2020 | 8:14 PM
Share

नवी मुंबई : विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांनतर आता सर्वांचे लक्ष नवी मुंबई महापालिका निवडणुकांकडे (Navi Mumbai municipal corporation election) लागलं आहे. या निवडणुका एप्रिलमध्ये होणार असून महाविकास आघाडीच्या जागा वाटपचा फॉर्म्युलाही ठरलेला आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या 111 प्रभागांपैकी शिवसेना 50, राष्ट्रवादी 40 आणि शिल्लक 21 प्रभाग काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. यात 14 जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात (Navi Mumbai municipal corporation election) रस्सीखेच सुरू आहे.

महापालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात होणार आहे. अगोदर बहुसदस्यीय पद्धतीने ठरलेली ही निवडणूक आता एकसदस्यीय पद्धतीने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी चार प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याठी शिवेसना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यावर अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व जबाबदारी सोपविली आहे, तर शिवसेनेच्या वतीने उपनेते विजय नाहटा बाजू सांभाळत आहे. काँग्रेसच्या वतीने स्थानिक अनिल कौशिक यांच्याकडे नवी मुंबईतील निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूकांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकत माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. या दरम्यान नाईक यांनी राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक फोडत नवी मुंबई महानगर पालिकेतील राष्ट्रवादीचे सरकारही पाडले होते. त्यामुळे गणेश नाईक यांना महापालिका सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या तीन पक्षांनी महाविकास आघाडी करण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे.

Follow Us
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.