AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच!” जयंत पाटलांनी भाकित वर्तवलं

Jayant Patil: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणाबाबत भाकित वर्वतलं आहे. मध्यावधी निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीसाठी किती तयार आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच! जयंत पाटलांनी भाकित वर्तवलं
जयंत पाटील, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस
| Updated on: Aug 28, 2022 | 1:12 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्याच्या राजकारणाबाबत भाकित वर्तवलं आहे. मध्यावधी निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीसाठी किती तयार आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं. “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार (Eknath Shinde) पडणारच!”, असा दावा जयंत पाटलांनी केला आहे. आता मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे माहित नाही पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार पडणार आणि मग मध्यावधी निवडणुका लागतील. जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी तयार आहोत, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

“मध्यावधी निवडणुका लागल्यास भाजप आणि शिंदे गटाला त तितकंस सोपं जाणार नाही. कारण लोकांना स्वज्वळ, प्रामणिक मुख्यमंत्री पाहायची सवय लागली आहे. त्या लोकांचा सध्या अपेक्षा भंग झाला आहे”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. पाच वर्ष आम्ही सक्षम विरोधीपक्षाची भूमिका बजावतो. “2024 ला पुन्हा निवडणूक लढतो आणि पुन्हा सत्ते येतो, असं भाजपने म्हटलं असतं तरी लोकांनी त्यांना स्विकारलं असतं. पण आता महाविकास आघाडीचं सरकार पाडून शिंदे गटाला सोबत घेत सत्तेत बसलेलं लोकांना पटलेलं नाही. त्यामुळे त्याचे परिणाम निवडणुकीत दिसतील”, असंही पाटील म्हणाले आहेत.

कोट्यावधींच्या देवाणघेवाणीतून सरकार आलं!

जयंत पाटील यांनी सरकार स्थापनेच्यावेळी काही देवाणघेवाण झाल्याचं जयंत पाटील म्हणालेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं तेव्हा कोट्यावधींच्या देवाणघेवाण झाली. हे सगळं महाराष्ट्रातील जनतेला पटेल, रुचेल असं वाटत नाही. शिंदेगटालील आमदारांचं पुढच्या टर्मला निवडूण येणं कठीण आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.

मध्यावधी निवडणुका लागतील का? असा प्रश्न काही दिवसांआधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारण्यात आला होता. तेव्हा सरकार पडेल आणि निवडणुका लागतील हे सांगायला मी ज्योतिषी नाही. निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत. नाही लागल्या तरी विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडणार आहोत, असं शरद पवार म्हणाले होते.

Follow Us
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले.
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय....
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय.....
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक.
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक...
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक....
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय.
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली...
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली....
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता.
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार...
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार....
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय.
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर...
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर....