AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jitendra Awhad: “संभाषणाची सुरुवात कशाने करायची हे पण तुम्हीच शिकवणार का?” जितेंद्र आव्हाड यांचा मुनगंटीवारांना परखड सवाल

"तुम्ही जर लोकांनी संभाषणाची सुरवात करावी तर कशाने करावी हे पण तुम्हीच सांगणार तुम्हीच शिकवणार का?" असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

Jitendra Awhad: संभाषणाची सुरुवात कशाने करायची हे पण तुम्हीच शिकवणार का? जितेंद्र आव्हाड यांचा मुनगंटीवारांना परखड सवाल
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 16, 2022 | 10:34 AM
Share

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली आहे. मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितलं नाही, त्यांनी आदेश काढला आहे. सांगणं वेगळं असतं आणि आदेश वेगळं असतं! भारतीय संस्कृतीमध्ये नमस्काराने भारतीय संस्कृती सुरू होते. या संस्करांमधे नमस्कार आहे. कित्येक लोक जयभीम म्हणतात, कित्येक लोक जय हिंद म्हणतात. साधारण पोलिस अधिकारी बोलताना जय हिंद शब्दाने बोलणं सुरू करतात .कोणी सस्रियाकाल म्हणेल कोणी जय भीम म्हणेल. कोणी नमस्कार म्हणेल किंवा कोणी वंदे मातरम् म्हणेल. त्यातून येणाऱ्या भावना महत्वाच्या आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मुनगंटीवर यांच्या निर्णयावर टीका केली आहे.

महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम्  म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. मात्र, त्यांच्या या घोषणेवरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यावर आक्षेप घेतलाय.

“अशी जोर जबरदस्ती करू नका. हा देश स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य मिळाले ते मोकळा श्वास घेण्यासाठी, श्वास कुठून कसा घ्यावा तो पण तुम्हीच ठरवणार का? इतकाही भारताचा श्वास गळा घोटण्याचा प्रकार करू नका. मला हॅलोच म्हणायचं आहे. मला जय भीम म्हणायचं आहे. आता ते जबरदस्ती आमच्या कडून म्हणवून पण घेणार की जबरदस्ती जेलमध्ये टाकणार. पोलिसांकडून केस टाकणार कायदा मोडला म्हणून 353?”, असंही आव्हाड म्हणालेत.

“इथे मिठाला लागलेल्या करा वरती लाखो लोक रस्त्यावर आले असा हा भारत आहे, त्याची पण आठवण ठेवा. हे स्वातंत्र्य मिळवणाऱ्यांनी 1942 मधे छोडो भारतचा नारा दिला आणि हजारो लोक रस्त्यावर झोपले. गोळ्या खाल्ल्या. रक्त सांडलं. पण मागे हटले नाहीत. आपला जी उद्देश आहे तो सोडला नाही”, असंही आव्हाडांनी म्हटलंय.

“उगाचच भारतीय राज्य घटनेने दिलेले स्वातंत्र्य तुमच्या हाताने गळा घोटू नका. कोणालाही ते आवडत नाही. कोणी काय खावं कोणी काय घालावं आता कोणी काय बोलावं हे पण तुम्ही ठरवणार का?”, असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केलाय.

Follow Us
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे...
अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार?
मोठा झटका! अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार? नगरविकास विभागाचा मोठा निर्णय!
आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी घडामोड! खासदारांनंतर आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा...
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब...
मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?