AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा थेट जनतेतूनच निवडावा; राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची मागणी

अकोला : नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार एकनाथ शिंदे यांनी बहाल केला आहे. नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडण्याच्या घोषणेनंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा जनतेतून निवडला गेला पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी(NCP […]

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा थेट जनतेतूनच निवडावा; राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची मागणी
vanita kamble
vanita kamble | Updated on: Jul 14, 2022 | 6:55 PM
Share

अकोला : नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार एकनाथ शिंदे यांनी बहाल केला आहे. नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडण्याच्या घोषणेनंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा जनतेतून निवडला गेला पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी(NCP MLA Amol Mitkari) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा जनतेतून निवडावा अशी मागणी केली आहे. ही मागणी करताना अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.

थेट जनतेतून संरपंच निवडणार

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन एक घोषणा केली आहे. सरपंच आणी नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडला जाणार. थेट लोकांमधून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडावा असे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना जर वाटत असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील जनतेतून निवडला गेला पाहिजे असं विधान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.

आमदार पळवून, चोरून नेऊन मंत्र्यांची निवड करणे अयोग्य

आमदार पळवून, चोरून नेऊन असं घाबरण्यासारखं अशी निवड अयोग्य आहे. त्याच्यामुळे हा निर्णय अंमलात आणत असताना कृषी मंत्री आणखी वेगवेगळ्या खात्याचे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सुद्धा जनतेतून निवडून आणण्याच धाडस करा असा सल्लाही मिटकरी यांनी दिला आहे. जनतेतून निवडून सरपंच आला पाहिजे हा निर्णय म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या अपमान आहे अशी टीका मिटकरी यांनी केली.

शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार

बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदान (voting) करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. 2020 ला हे अधिकार रद्द करण्यात आले होते. मात्र, आता मुख्यमंत्र्याच्या घोषणेप्रमाणे नगराध्यक्ष आणि सरपंच थेट लोकांमधून निवडले जाणार आहेत. इतकेच नाही तर बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार (Rights) मिळणार आहे.

Follow Us
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक.
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक.
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची.
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात.
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च.
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.