AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार

बीडमधील परळी आणि केज मतदारसंघात जोपर्यंत राष्ट्रवादीचे आमदार निवडून येत नाहीत, तोपर्यंत फेटा न बांधण्याचा निर्धार शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

...तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार
| Updated on: Aug 25, 2019 | 2:53 PM
Share

बीड : परळी आणि केज मतदारसंघात जोपर्यंत आमचे आमदार निवडून येत नाहीत, तोपर्यंत फेटा बांधणार नाही. जेव्हा आमदार होतील, त्यावेळी या व्यासपीठावर येऊन फेटा बांधेन, असा निर्धार शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (NCP MP Dr Amol Kolhe) यांनी व्यक्त केला आहे. आंबेजोगाईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु होताच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरु आहे. एकीकडे राजकीय पळवापळवी सुरु आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सर्व पक्षांनी यात्रांचा धडाका लावला आहे.

तरुणांच्या तोंडाला पानं पुसून पदवीबरोबरच बेरोजगारीचे सर्टिफिकीट देणाऱ्या शासनकर्त्यांच्या चाली वेळीच ओळखा. मराठवाड्यातील युवा म्हणजे धगधगता अंगार आहे. या तरुणाईला सावध करण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आहे, अशा शब्दात डॉ. अमोल कोल्हेंनी तरुणांना जागं होण्यास सांगितलं.

नमिता मुंदडा यांनी अमोल कोल्हे यांना फेटा बांधायला घेतला. मात्र अमोल कोल्हे यांनी फेटा बांधण्यास नकार दिला. येत्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे आणि नमिता मुंदडा आमदारपदी बसत नाहीत, तोपर्यंत फेटा बांधणार नसल्याचं डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

विधानसभेसाठी परळी मतदारसंघात भाजपच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची लढत त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासोबत आहे. पंकजा मुंडे 2009 पासून परळीत आमदार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात होणारी लढत अटीतटीची ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आणि आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता शिवस्वराज्य यात्रा (NCP Shiv Swarajya Yatra) काढत आहे.

लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा दारुण पराभव केला होता.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.