AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : ‘त्या’ 105 आमदारांमध्ये 50 आमचे आहेत हे लक्षात ठेवा; सुप्रिया सुळेंचा भाजपला सूचक इशारा

Supriya Sule :पैसे देऊन जाणारे आहेत. त्याच्यामागे सध्या काय राजकारण सुरू आहे लक्षात आले पाहिजे. मात्र आपण विरोधात असताना आपल्या पक्षाने लीड घ्यावा, असे देशातील लोकांना वाटत आहे, याकडेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

Supriya Sule : 'त्या' 105 आमदारांमध्ये 50 आमचे आहेत हे लक्षात ठेवा; सुप्रिया सुळेंचा भाजपला सूचक इशारा
सुप्रिया सुळेंचा भाजपला सूचक इशाराImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 12, 2022 | 5:21 PM
Share

मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला राष्ट्रवादीच्या (ncp) खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलेच फटकारे लगावले आहेत. निवडणूका असो नसो आपल्या पक्षाच्या बैठका या होतच असतात. विरोधी पक्षात असताना लोकांनी शरद पवारांना (sharad pawar) जास्त प्रेम दिले आहे. सत्तेत असतानाही दिले आहे. आता जे काही 105 असल्याचे बोलत आहेत, त्यात आपल्या पक्षातून गेलेले आपले 50 आहेत हे लक्षात ठेवा, असे सूचक विधान खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांनी केले. आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. काय करायचं असं जेव्हा साहेबांना विचारते त्यावेळी पवारसाहेब पावसाचे वातावरण थोडे कमी झाल्यावर गाडी बाहेर काढून शेवटच्या युवकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.

पैसे देऊन जाणारे आहेत. त्याच्यामागे सध्या काय राजकारण सुरू आहे लक्षात आले पाहिजे. मात्र आपण विरोधात असताना आपल्या पक्षाने लीड घ्यावा, असे देशातील लोकांना वाटत आहे, याकडेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. नवाबभाई यांनी दिल्लीला अक्षरशः हलवून सोडलं होतं. मोठा फर्जीवाडा बाहेर काढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तर दुसरीकडे अनिल देशमुख यांच्यावरही कारवाई झाली. हा एकप्रकारे अन्याय झाला, असं त्या म्हणाल्या.

दादा-पाटील यांनी एकत्र दौरा केला तर बदल होईल

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवारांनी एकत्र दौरा काढला तर राज्यात मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळे 2024 मध्ये राष्ट्रवादी हा एक नंबरचा पक्ष होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी राज्यातील अनेक जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, निरीक्षकांनी आपली मते, विचार व्यासपीठावर मांडली.

कोर्टाचा निकाल आपल्याच बाजूने लागेल

यावेळी राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार बॅटिंग केली. बाहेर काय पाऊस.. काय वारा पण सगळे आले बघा.. ओक्केमध्ये आहे, अशी भाषणाची सुरुवात करत छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.

जातीय जनगणना करा

आडनावावरून नोंदणी करु नका तरी केली गेली. ठाण्यात दहा टक्के ओबीसी दाखवले आहेत. ओबीसी 54 टक्के आहेत. त्यामुळे जातीय जनगणना करा. निवडणूकीसाठी आपल्याला तयार रहावे लागणार आहे यावरच पुढच्या विधानसभा व विधानपरिषदेच्या निवडणूका आहेत, असं भुजबळ म्हणाले. .

शायरीतून झापले

आता आपण विरोधात आहोत. त्यामुळे जे चुकीचे आहे त्याविरोधात आपण ठामपणे उभे राहायला हवे. ‘गलत का विरोध खुलकर किजीए, राजनीती हो या समाजनीती, इतिहास विरोध करनेवालों का लिखा जाता है तलवे चाटनेवालों का नही’ असा टोलाच भुजबळ यांनी शायरीतून लगावला.

Follow Us
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.