नवी मुंबईत पोस्ट ऑफिसबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची घोषणाबाजी, व्यंकय्या नायडूंना ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणेचे 20 लाख पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यंकय्या नायडू यांना 'जय भवानी, जय शिवाजी' लिहिलेलं 20 लाख पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे (NCP send 20 lakh letter to vice president venkaiah naidu).

नवी मुंबईत पोस्ट ऑफिसबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची घोषणाबाजी, व्यंकय्या नायडूंना 'जय भवानी, जय शिवाजी' घोषणेचे 20 लाख पत्र
Follow us
| Updated on: Jul 24, 2020 | 5:50 PM

नवी मुंबई : राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी‘, अशी घोषणा केल्याने राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या गोष्टीचा निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी, जय शिवाजी’ लिहिलेलं 20 लाख पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे (NCP send 20 lakh letter to vice president venkaiah naidu).

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गुरुवारपासून (23 जुलै) व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवले जात आहेत. विशेष म्हणजे आज (24 जुलै) नवी मुंबईतदेखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी वाशी आणि खारघर पोस्ट ऑफिसबाहेर ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी करत व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवले (NCP send 20 lakh letter to vice president venkaiah naidu).

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी शहबाझ पटेल, प्रशांत पाटील, तेजस शिंदे, गौतम आगा, राजेश भोर, योगेश काळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात 22 जुलै रोजी खासदारकीची शपथ घेतली. भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिल्याने राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिली. मात्र, या घटनेमुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ‘जय भवानी, जय शिवाजी’लिहिलेलं पत्र व्यंकय्या नायडू यांना पाठवले जात आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी उदयनराजे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

उदयनराजे यांचे स्पष्टीकरण

महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, पण तसं काही झालंच नाही व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही” अशा शब्दात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथविधीनंतर काही घडलेच नसल्याचा दावा केला आहे.

सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला तो, फक्त जे राज्यघटनेत नाही त्याला घेतला, माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती, आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झालं, महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

“माझा स्वभाव पाहता मी ऐकून घेईन असं वाटतं का तुम्हाला? या सभागृहाचा चेअरमन मी आहे, असं फक्त ते (नायडू) म्हणाले. आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला, व्यंकय्या नायडूंनी उलट त्यांना थांबवलं, पवारसाहेब तिथेच बसले होते, आपण त्यांना विचारा, जे घडलं नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, ही हात जोडून कळकळीची विनंती” असे उदयनराजे म्हणाले.

व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचं केलं नाही, त्यांनी काही चुकीचं केलं असतं, तर मीच माफीची मागणी केली असती. असंही उदयनराजे म्हणाले.

संबंधित बातम्या :

इंग्रजीतून शपथ घेऊन उदयनराजे म्हणाले, जय भवानी, जय शिवाजी, सभापतींकडून समज

व्यंकय्या नायडूंविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक, ब्राह्मण महासंघाकडून माफीची मागणी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.