AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुण न जुळवता फक्त सत्तेच्या आकर्षणावर लग्नाची घाई, संदीप देशपांडेंचा महासेनाआघाडीला टोला

संदीप देशपांडेंनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या एकत्रित सत्तास्थापनेवर ही टीका केली (Sandeep Deshpande on Maharashtra political crisis) आहे.

गुण न जुळवता फक्त सत्तेच्या आकर्षणावर लग्नाची घाई, संदीप देशपांडेंचा महासेनाआघाडीला टोला
| Updated on: Nov 20, 2019 | 5:21 PM
Share

मुंबई : राज्यात सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप कायम आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 3 आठवडे उलटले (Sandeep Deshpande on Maharashtra political crisis) आहेत. तरीही अद्याप सत्तास्थापन झालेली नाही. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक टीका केली (Sandeep Deshpande on Maharashtra political crisis) आहे. लग्न जुळवताना पत्रिकेत सर्व गुण जुळतात की नाही हे पाहत नाहीत आणि लग्न जुळवत आहेत, त्यांच्यासाठी शुभमंगल ‘सावधान’. अशी टीकासंदीप देशपांडेंनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या एकत्रित सत्तास्थापनेवर केली (Sandeep Deshpande on Maharashtra political crisis) आहे.

“आपण जेव्हा लग्न करतो. तेव्हा सुद्धा पत्रिका बघतो. त्यावेळी 36 गुण जुळतात का? किंवा त्यापूर्वी आपले विचार जुळतात का? हे बघतो. मात्र आता इथे असे काहीही राहिलेले नाही. फक्त सत्तेच्या आकर्षणावर लग्न करायची घाई सुरु आहे. त्यामुळे जे लग्नात सर्व ठिकाणी ‘शुभमंगल सावधान’ म्हणतात, तेच आजही म्हणावसं वाटत आहे.” असे संदीप देशपांडे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक जुन्या भाषणातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावर संदीप देशपांडे यांना विचारले असता, ते म्हणाले राज ठाकरे हे महाराष्ट्राचे दूरचा विचार करणारे नेते आहेत. त्यांनी कुठल्याही परिस्थितीचे वर्णन हे त्यांनी अगोदरच केलं आहे. मग ते पुलावामा हल्ला असेल किंवा महाराष्ट्राची आजची जी राजकीय परिस्थिती आहे. त्या पद्धतीने एका विचारधारेवर जे लोक एकत्र राहिले ते विचारधारा विसरुन एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठी तो व्हिडीओ तंतोतंत लागू होत आहे. म्हणून मीसुद्धा तो सोशल मीडियावर शेअर (Sandeep Deshpande on Maharashtra political crisis) केला आहे.

या व्हिडीओमध्ये राज ठाकरे म्हणतात की, “ज्या लोकांनी भाजप -शिवसेना एकत्र निवडणुका लढल्या, ते निवडणूक झाल्यानंतर आज शिवसेना राष्ट्रवादीसोबत चालली आहे. भाजप विरोधी पक्षात आहे. हा काय पत्त्यांचा क्लब आहे का की माझे पत्ते पिसून झाले आता तू पत्ते पीस…”या वाक्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले.

दरम्यान राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना गेले काही दिवस राज ठाकरे यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच राज ठाकरे यांनी या व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे सध्याची परिस्थिती घडत असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा या जुना व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. यापूर्वी राज ठाकरे यांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यातच हा नवा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत (Sandeep Deshpande on Maharashtra political crisis) आहे.

संबंधित बातम्या : 

पवार-मोदी 45 मिनिटे भेट, शरद पवारांनी मोदींना दिलेलं पत्र जसंच्या तसं

आधी पवारांसोबत चर्चा, मग मोदींनी तात्काळ अमित शाहांना बोलावलं!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...