AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीयूष गोयल हे शेती तज्ञ? ही तर माझ्या ज्ञानात भर, शरद पवारांचा टोमणा

सरकारने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या सगळ्यात लक्ष घालण्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली. | Sharad Pawar

पीयूष गोयल हे शेती तज्ञ? ही तर माझ्या ज्ञानात भर, शरद पवारांचा टोमणा
पीयूष गोयल हे आमचे मित्र आहेत. परंतु पीयूष गोयल आणि शेती यामधलं मला माहिती नाही.
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Feb 07, 2021 | 4:49 PM
Share

बारामती: दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलकांशी केंद्र सरकारकडून चर्चा करण्यात आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी टोला लगावला आहे. पीयूष गोयल हे मुंबईतील आहेत. ते आमचे मित्र आहेत. परंतु पीयूष गोयल आणि शेती यामधलं मला माहिती नाही. पीयूष गोयल हे शेतीतज्ज्ञ आहेत हे ऐकून माझ्या ज्ञानात नवी भर पडली, असे शरद पवार यांनी म्हटले. (Sharad pawar take a dig at Piyush Goyal over Farmers protest)

ते रविवारी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात भाष्य केले. सरकारने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या सगळ्यात लक्ष घालण्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली.

‘शेती हा राज्यांचा अखत्यारितील प्रश्न पण केंद्राने कायदा केला’

कृषी कायद्याबाबत अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना चर्चा सुरु झाली. त्यानंतर यूपीए सरकारच्या काळात आम्ही कृषी कायद्यांबाबत प्रत्येक राज्याचं मत मागवलं होतं. आम्ही यासाठी समितीही स्थापन केली होती. ही समिती मसुदा तयार करुन राज्यांना अभ्यासासाठी दिली होती. परंतु मोदी सरकारने थेट कायदाच लागू केला.

मुळात शेती हा राज्याच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्याचे मत जाणून घेणे गरजेचे होते. कृषी कायदे करताना कोणतीही चर्चा झाली नाही. हा राज्याचा विषय असताना केंद्राने परस्पर कायदे केले, ही माझी तक्रार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. कृषी क्षेत्रात बदल होणे आवश्यक आहे. त्यामुळे शक्य असेल तिथे बदल करण्याला माझा विरोध नाही. मात्र, त्यासाठी एकत्र चर्चा करुन निर्णय घेण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

‘मोदी आणि गडकरींनी दिल्लीती शेतकऱ्यांशी थेट चर्चा करावी’

तीन-चार राज्यांतील शेतकरी दिल्लीत 70 दिवस ऊन, थंडी, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करात ठाण मांडून बसले आहेत. शेतकरी अशाप्रकारे रस्त्यावर येतो तेव्हा सरकारने संवेदनशीलपणा दाखवला पाहिजे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी या ज्येष्ठ नेत्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

नारायण राणेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद, फारसं लक्ष देऊ नका: शरद पवार

पवारांची फक्त तीन वाक्यं आणि ठाकरे सरकारमध्ये पूर्ण उलथापालथीचे संकेत?; वाचा सविस्तर

(Sharad pawar take a dig at Piyush Goyal over Farmers protest)

Follow Us
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!