AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मग मी त्यात बोट घातलं होतं का? नितेश राणेंनी स्वत:च्या आरोग्याची कुंडलीच मांडली, आजार राजकीय?

नितेश राणे यांचा आजार राजकीय असल्याची टीका करण्यात येत आहे. या टीकेला नितेश राणे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांना प्रत्यु्त्तर देताना नितेश राणे यांनी आपल्या आरोग्याची (health) कुंडलीच मांडली आहे.

मग मी त्यात बोट घातलं होतं का? नितेश राणेंनी स्वत:च्या आरोग्याची कुंडलीच मांडली, आजार राजकीय?
नितेश राणे
| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 4:19 PM
Share

सिंधुदुर्ग : संतोष परब हल्लाप्रकरणात (Attack on Santosh Parab) अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जामीन मंजूर झालेले भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रकृती आता झपाट्याने सुधारताना दिसत आहे. यावरून विरोधकांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नितेश राणे यांचा आजार राजकीय असल्याची टीका करण्यात येत आहे. या टीकेला नितेश राणे यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांना प्रत्यु्त्तर देताना नितेश राणे यांनी आपल्या आरोग्याची (health) कुंडलीच मांडली आहे. मी जरी कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी मला आजही त्रास होतोय. त्यामुळे मी एसएसपीएम रुग्णालयात दाखल होणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. मला पाठिच्या मनक्याचा त्रास होत आहे. माझी शुगर लो आहे. मात्र तरीही काही जण म्हणतात की माझा आजार हा राजकीय होता, मग डॉक्टरांनी केलेल्या टेस्ट खोट्या होत्या का असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी तेव्हा गळ्यात बेल्ट का घातला?

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, डॉक्टरांनी माझा आताच बीपी चेक केला. माझा बीपी 152 पर्यंत लो झाला आहे. मग डॉक्टरांनी आतापर्यंत माझ्या ज्या काही टेस्ट केल्या त्या खोट्या आहेत का? कुणाच्याही तब्येतीबद्दल प्रश्न विचारणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. प्रश्न आम्ही देखील विचारू शकतो.  जेव्हा सरकार पाडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? लतादीदींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जातात, त्यावेळी कुठलाही बेल्ट नसतो. अधिवेशनावेळी ते आजारी कसे पडतात? चौकशीवेळीच त्यांना कोरोना कसा होतो? असे म्हणत नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर देखील निशाणा साधला आहे.

राजकारणाचा स्थर खालावला आहे

विरोधक माझ्यावर टीका करताना म्हणाले की माझा आजार राजकीय होता. जामीन मिळाल्यानंतर लगेच बरे वाटले. कुणाच्याही आरोग्याबद्दल असे प्रश्न विचारणं किती योग्य आहे, हे तपासण्याची वेळ आलीये.  राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो, यावरही विचार करावा. सध्या मला बीपीचा त्रास आहे. तसेच पाठीच्या मनक्याचा देखील त्रास आहे. त्यामुळे मी आता काही काळ आराम करणार आहे. त्यानंतर पुन्हा कामाला लागेल. दीड महिन्यापासून मी मतदारसंघात गेलो नाही. माझ्यावर गोव्याची देखील जबाबदारी आहे, त्यामुळे तिथेही जावे लागणार आहे. मी तब्येत सांभाळून काम करणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Nitesh Rane Video: आधी तुरुंगाची हवा, नंतर आजारपण; जामीन मिळाल्यानंतर बाहेर येताच काय म्हणाले नितेश राणे?

मग मुख्यमंत्री गळ्याला बेल्ट का घालतात? दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर नितेश राणेंच्या सवालाच्या फैरी

Vijay Vadettiwar | उत्तरप्रदेशात भाजपची नव्हे, असंतोषाची लाट, पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांचा पलटवार

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली