AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशीलकुमार आणि विलासरावांनी महाराष्ट्राचा बँड बाजा वाजवला : गडकरी

सोलापूर : “काँग्रेसने आपल्या चेले-चपट्यांची गरिबी हटवली. सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राचा बँडबाजा वाजविला”, असा घणाघात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. ते सोलापुरात बोलत होते. सोलापूरचे भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रचारार्थ गडकरींची जाहीर सभा झाली. यावेळी गडकरींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. आम्हाला चिंता तरुणांना रोजगार देण्याची, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या […]

सुशीलकुमार आणि विलासरावांनी महाराष्ट्राचा बँड बाजा वाजवला : गडकरी
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

सोलापूर : “काँग्रेसने आपल्या चेले-चपट्यांची गरिबी हटवली. सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राचा बँडबाजा वाजविला”, असा घणाघात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. ते सोलापुरात बोलत होते. सोलापूरचे भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रचारार्थ गडकरींची जाहीर सभा झाली. यावेळी गडकरींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.

आम्हाला चिंता तरुणांना रोजगार देण्याची, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या मुलांना रोजगार मिळवून देण्याची चिंता आहे, असा आरोप गडकरींनी केला.

“मेरा भारत महान और मुझे नही दिया तो दे दो कम से कम देशी दारु का दुकान”, अशी मिश्किल टिप्पणी गडकरींनी केली. गडकरी म्हणाले, एक पाव डटाओ, गरिबी हटाओ, हो गया विकास… ना जात पर ना बात पर, सोनियाजी और शरद पवार के हात पर, अशा कोपरखळ्या गडकरींनी लगावल्या.

“भाजपच्या काळात महाराष्ट्राचा चोफेर विकास झाला आहे. पाच लाख कोटीचे रस्ते मी बांधलेत. आपण,आपली मुले, आणि नातंवडे असेपर्यंत खड्डे पडणार नाहीत याची काळजी मी घेतली. दहा हजार कोटींची बुद्ध सर्किटचं काम पूर्ण करत आहोत. राम जानकी सर्किटचं काम पूर्ण करत आहोत. मी फोकनाड नेता नाही. जे बोलतो ते करून दाखवतो”, असं गडकरींनी सांगितलं.

पाकिस्तानने भाईचारा ठेवला नाही, निरापराध लोकांना मारतात. म्हणून मी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं, आपल्या तीन नद्यांचं पाणी बंद करणार. पाकिस्तान तडफडून मरणार होते, असं गडकरी म्हणाले.

सोलापुरात काँटे की टक्कर

2014 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर, पुन्हा एकदा काँग्रेसने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. 2014 साली मोदीलाटेमुळे शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, सोलापूरची जागा काँग्रेसची हक्काची जागा मानली जाते. मात्र, यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे आव्हान असल्याने सोलापूरची लढत रंगतदार होणार, हे निश्चित.

संबंधित बातम्या

माझी शेवटची निवडणूक, मला विजयी करा : सुशीलकुमार शिंदे  

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.