सुशीलकुमार आणि विलासरावांनी महाराष्ट्राचा बँड बाजा वाजवला : गडकरी

सोलापूर : “काँग्रेसने आपल्या चेले-चपट्यांची गरिबी हटवली. सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राचा बँडबाजा वाजविला”, असा घणाघात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. ते सोलापुरात बोलत होते. सोलापूरचे भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रचारार्थ गडकरींची जाहीर सभा झाली. यावेळी गडकरींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. आम्हाला चिंता तरुणांना रोजगार देण्याची, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या […]

सुशीलकुमार आणि विलासरावांनी महाराष्ट्राचा बँड बाजा वाजवला : गडकरी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

सोलापूर : “काँग्रेसने आपल्या चेले-चपट्यांची गरिबी हटवली. सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राचा बँडबाजा वाजविला”, असा घणाघात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. ते सोलापुरात बोलत होते. सोलापूरचे भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रचारार्थ गडकरींची जाहीर सभा झाली. यावेळी गडकरींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.

आम्हाला चिंता तरुणांना रोजगार देण्याची, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या मुलांना रोजगार मिळवून देण्याची चिंता आहे, असा आरोप गडकरींनी केला.

“मेरा भारत महान और मुझे नही दिया तो दे दो कम से कम देशी दारु का दुकान”, अशी मिश्किल टिप्पणी गडकरींनी केली. गडकरी म्हणाले, एक पाव डटाओ, गरिबी हटाओ, हो गया विकास… ना जात पर ना बात पर, सोनियाजी और शरद पवार के हात पर, अशा कोपरखळ्या गडकरींनी लगावल्या.

“भाजपच्या काळात महाराष्ट्राचा चोफेर विकास झाला आहे. पाच लाख कोटीचे रस्ते मी बांधलेत. आपण,आपली मुले, आणि नातंवडे असेपर्यंत खड्डे पडणार नाहीत याची काळजी मी घेतली. दहा हजार कोटींची बुद्ध सर्किटचं काम पूर्ण करत आहोत. राम जानकी सर्किटचं काम पूर्ण करत आहोत. मी फोकनाड नेता नाही. जे बोलतो ते करून दाखवतो”, असं गडकरींनी सांगितलं.

पाकिस्तानने भाईचारा ठेवला नाही, निरापराध लोकांना मारतात. म्हणून मी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं, आपल्या तीन नद्यांचं पाणी बंद करणार. पाकिस्तान तडफडून मरणार होते, असं गडकरी म्हणाले.

सोलापुरात काँटे की टक्कर

2014 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर, पुन्हा एकदा काँग्रेसने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. 2014 साली मोदीलाटेमुळे शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, सोलापूरची जागा काँग्रेसची हक्काची जागा मानली जाते. मात्र, यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे आव्हान असल्याने सोलापूरची लढत रंगतदार होणार, हे निश्चित.

संबंधित बातम्या

माझी शेवटची निवडणूक, मला विजयी करा : सुशीलकुमार शिंदे  

Non Stop LIVE Update
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.