AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशीलकुमार आणि विलासरावांनी महाराष्ट्राचा बँड बाजा वाजवला : गडकरी

सोलापूर : “काँग्रेसने आपल्या चेले-चपट्यांची गरिबी हटवली. सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राचा बँडबाजा वाजविला”, असा घणाघात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. ते सोलापुरात बोलत होते. सोलापूरचे भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रचारार्थ गडकरींची जाहीर सभा झाली. यावेळी गडकरींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. आम्हाला चिंता तरुणांना रोजगार देण्याची, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या […]

सुशीलकुमार आणि विलासरावांनी महाराष्ट्राचा बँड बाजा वाजवला : गडकरी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

सोलापूर : “काँग्रेसने आपल्या चेले-चपट्यांची गरिबी हटवली. सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राचा बँडबाजा वाजविला”, असा घणाघात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. ते सोलापुरात बोलत होते. सोलापूरचे भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रचारार्थ गडकरींची जाहीर सभा झाली. यावेळी गडकरींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.

आम्हाला चिंता तरुणांना रोजगार देण्याची, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या मुलांना रोजगार मिळवून देण्याची चिंता आहे, असा आरोप गडकरींनी केला.

“मेरा भारत महान और मुझे नही दिया तो दे दो कम से कम देशी दारु का दुकान”, अशी मिश्किल टिप्पणी गडकरींनी केली. गडकरी म्हणाले, एक पाव डटाओ, गरिबी हटाओ, हो गया विकास… ना जात पर ना बात पर, सोनियाजी और शरद पवार के हात पर, अशा कोपरखळ्या गडकरींनी लगावल्या.

“भाजपच्या काळात महाराष्ट्राचा चोफेर विकास झाला आहे. पाच लाख कोटीचे रस्ते मी बांधलेत. आपण,आपली मुले, आणि नातंवडे असेपर्यंत खड्डे पडणार नाहीत याची काळजी मी घेतली. दहा हजार कोटींची बुद्ध सर्किटचं काम पूर्ण करत आहोत. राम जानकी सर्किटचं काम पूर्ण करत आहोत. मी फोकनाड नेता नाही. जे बोलतो ते करून दाखवतो”, असं गडकरींनी सांगितलं.

पाकिस्तानने भाईचारा ठेवला नाही, निरापराध लोकांना मारतात. म्हणून मी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं, आपल्या तीन नद्यांचं पाणी बंद करणार. पाकिस्तान तडफडून मरणार होते, असं गडकरी म्हणाले.

सोलापुरात काँटे की टक्कर

2014 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर, पुन्हा एकदा काँग्रेसने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. 2014 साली मोदीलाटेमुळे शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, सोलापूरची जागा काँग्रेसची हक्काची जागा मानली जाते. मात्र, यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे आव्हान असल्याने सोलापूरची लढत रंगतदार होणार, हे निश्चित.

संबंधित बातम्या

माझी शेवटची निवडणूक, मला विजयी करा : सुशीलकुमार शिंदे  

Follow Us
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!