Nitish Kumar : नितीश कुमार यांनी घेतली आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ; तेजस्वी यादव यांनाही पद आणि गोपनियतेची शपथ

Nitish Kumar : नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला आहे. ज्यांचे आमदार ज्यास्त त्यांना अधिक मंत्रीपदे देण्याचं दोन्ही नेत्यांचं ठरलं आहे. त्यानुसार नितीश कुमार यांच्या पक्षाला 12 तर तेजस्वी यादव यांच्या पक्षाला 21 मंत्रीपदे मिळणार आहेत.

Nitish Kumar : नितीश कुमार यांनी घेतली आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ; तेजस्वी यादव यांनाही पद आणि गोपनियतेची शपथ
Nitish Kumar : नितीश कुमार यांनी घेतली आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ; तेजस्वी यादव यांनाही पद आणि गोपनियतेची शपथ Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 2:35 PM

पाटणा: जेडीयूचे नेते नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आठव्यांदा बिहारच्या (bihar) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्यासोबतच आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या पाया पडून त्यांचे दर्शन घेतले. गेल्या 22 वर्षात नितीश कुमार हे आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. 2000मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी ते अवघे सात दिवसच मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी नंतर कधी मागे वळून पाहिलं नाही.

भाजप पक्षाकडून जेडीयूत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करून नितीश कुमार यांनी भाजपशी असलेली युती तोडली. काल आमदार आणि खासदारांची बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली. त्यात भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी राज्यपालांची भेट घेऊन बहुमताचा आकडा सादर केला. त्यानंतर आज राजभवनात छोटेखानी समारंभात या दोन्ही नेत्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी दोन्ही पक्षाचे आमदार उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

सत्तेचा फॉर्म्युला ठरला

दरम्यान, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला आहे. ज्यांचे आमदार ज्यास्त त्यांना अधिक मंत्रीपदे देण्याचं दोन्ही नेत्यांचं ठरलं आहे. त्यानुसार नितीश कुमार यांच्या पक्षाला 12 तर तेजस्वी यादव यांच्या पक्षाला 21 मंत्रीपदे मिळणार आहेत. डाव्यांना चार मंत्रिपदे मिळणार आहेत. तर काँग्रेसलाही चांगली खाती दिली जाणार आहे. नितीश कुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आणि गृहखातं राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर तेजस्वी यादव यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद, विधानसभा अध्यक्षपद आणि अर्थ खातं राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे. तर काँग्रेसला महसूल खातं दिलं जाणार आहे.

सर्व काही माफ

गेल्या काही वर्षात नितीश कुमार आणि आरजेडी दरम्यान शाब्दिक युद्ध रंगलं होतं. लालूप्रसाद यादव यांनी तर नितीश कुमार यांना साप म्हटलं होतं. नितीश कुमार यांनीही लालूंवर पलटवार केला होता. त्यावर राबडी देवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जूनं सर्व काही माफ आहे. सर्व काही विसरून पुढे जायचं आहे, असं राबडी देवी म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.