इंदिरा गांधी यांची “अंधारातील शिकार”; पाकिस्तानने मागितला अर्धा हिस्सा, कोणता होता मोठा खजिना?
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जयगड किल्ल्यामध्ये खजिन्याची मोठी शोधाशोध केली. पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार भुट्टो यांनी इंदिरा गांधी यांना पत्र लिहून किल्ल्याच्या संपत्तीमध्ये वाटा मागितला. पण... इंदिरा गांधी यांनी त्यांना उलट उत्तर पाठविले. ही होती अंधारातील शिकार...

मुघल सम्राट अकबर (Mughal Samrat Akbar) याच्या कारकिर्दीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. जयपूरचा राजा मानसिंग I (Raja Mansing 1) हा सम्राट अकबर याचा एक बडा सरदार होता. राज मानसिंग हा जयपूरचा सरंजामदार (Jaipur Feudal Lord) होता. सम्राट अकबर याचे वडील बादशहा हुमायून (Badshaha Humayun) याने जयपूरच्या या सरंजामदार घराण्याला राजा ही पदवी दिली होती. मुघल शासकांशी हे घराणे एकनिष्ठ होते. त्यामुळे अकबर याने राजा मानसिंग I याला 1581 मध्ये एका मोहिमेवर पाठविले. अकबर याला काबूलच्या (Kabul) उत्तर – पश्चिम सीमेवर (सध्याचा अफगाणिस्तान – Afghanistan) मोठा विरोध होत होता. अनेक राज्ये, सरदार यांनी बंडे केली होती. त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी अकबर याने राजा मानसिंग I याच्यावर सोपविली. राजा मानसिंग I याने काबुल मोहीम करून त्या बंडखोरांचा पराभव केला. त्याने अनेकांचा पराभव करून बराचसा भाग मुघलांच्या अधिपत्याखाली आणला. या मोहिमेदरम्यान राजा मानसिंग याला काबूलमध्ये सोन्याचा मोठा खजिना सापडला. काबुल मोहीम संपवून सापडलेला खजिना घेऊन 1857 मध्ये राजा मानसिंग I भारतात परतला. ...
