AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षांची बंदूक : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (15 डिसेंबर) गुजरातमधील कच्छ (Gujarat kuch) येथे अनेक योजनांचं उद्घाटन केलं.

शेतकऱ्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षांची बंदूक : पंतप्रधान मोदी
| Updated on: Dec 15, 2020 | 4:20 PM
Share

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (15 डिसेंबर) गुजरातमधील कच्छ (Gujarat kuch) येथे अनेक योजनांचं उद्घाटन केलं. ते एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर (Farmers Protest) मोदी कच्छमधील शेतकरी समुहांशिवाय गुजरातच्या शिख शेतकऱ्यांच्याही भेटी घेणार आहेत. ते या ठिकाणी देखील काही योजना सुरु करतील, अशी माहिती आहे (PM Modi criticize opposition over Farmer Protest in Gujarat kuch tour).

पंतप्रधान मोदी कच्छमध्ये सोलर पार्कसह अनेक योजनांची सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले, “शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे त्यांच्या जमिनीवर दुसरे ताबा घेतील अशी भीती शेतकऱ्यांना दाखवली जात आहे. एखाद्या डेयरीवाल्याने तुमच्याशी दुध घेण्याचा करार केला तर तो तुमचं जनावर घेऊन जातो का? धान्य आणि दाळी उत्पादन करणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांना त्यांचं पीक विकण्याचं स्वातंत्र्य का मिळायला नको असा प्रश्न देश विचारत आहे. शेतीत सुधारणा करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अनेक शेतकरी संघटनांनी देखील शेतीमाल कुठेही विकण्याचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करत होते. ”

“आज जे लोक विरोधी पक्षात बसून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत ते देखील आपल्या कार्यकाळात या सुधारणांचं समर्थन करत होते. ते शेतकऱ्यांना केवळ खोटे आश्वासनं देत राहिले. आता देशाने काही पावलं उचलली आहेत तर ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. मी शेतकरी भावा-बहिणींना हेच सांगेल ती सरकार तुमच्या प्रत्येक शंकेचं समाधान काढेल, त्यासाठी सरकार 24 तास तयार आहे. शेतकऱ्यांचं हित पहिल्या दिवसापासून आमचं प्राधान्य राहिलं आहे,” असं मोदी म्हणाले.

“कोटेश्वर महादेवाच्या आशीर्वादाने कच्छ बदललं आहे. कोरोनाने नक्कीच जग बदललं, मात्र कच्छचा रणउत्सव आजही जगाला आकर्षित करतो. भारत सरदार पटेलांचं स्वप्न पूर्ण करत आहेत,” असंही मोदींनी नमूद केलं.

पंतप्रधान मोदींनी सर्वात आधी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मांडवीमध्ये खारं पाणी वापरण्यायोग्य बनवणाऱ्या संयंत्राचंही उद्घाटन केलं. पंतप्रधान मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत खावडामध्ये जगातील सर्वात मोठे मिश्र रुपातील नवीन ऊर्जा पार्कही सुरु करण्यात आले. यामुळे 30,000 मेगावॅट क्षमतेच्या मिश्रित नव्या ऊर्जा पार्कमध्ये सौर पॅनल आणि पवनचक्कीच्या मदतीने ऊर्जा निर्माण केली जाणार आहे. याशिवाय कच्छ आणि सौराष्ट्रात खारं पाणी वापरायोग्य करणाऱ्या आणखी 4 संयंत्राचंही उद्घाटन करण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदी कच्छ जिल्ह्यातील सहकारी दुग्ध उत्पादक संघ, सरहद डेयरीमार्फत स्थापन केलेल्या एका संयंत्राचंही उद्घाटन करतील. या संयंत्रात 2 लाख लीटर दूध थंड करण्याची क्षमता आहे. ते केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनंतर्गत या डेयरी संयंत्राचं उद्घाटन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गुजरातमधील शिख शेतकऱ्यांशी मोदी चर्चा करणार

गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सीमेवर वसलेल्या शिख शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. कच्छ जिल्ह्यातील लखपत तालुक्यात आणि आजूबाजूच्या परिसरात मिळून एकूण 5,000 शिख कुटुंबं राहतात.

हेही वाचा :

नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठ्या एनर्जी पार्कचे करणार भूमीपूजन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- गडकरी

कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारता, मग देशात घोषित आणीबाणी आहे का? : उद्धव ठाकरे

PM Modi criticize opposition over Farmer Protest in Gujarat kuch tour

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.