AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून अजित दादांनी मंत्रालयातील ‘ती’ केबिन नाकारली

राष्ट्रवादीचे बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांनी चौथ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, उपमुख्यमंत्री झाल्यावर अजित दादांनी मंत्रालयातील सहाव्या माळ्यावरील 'ती' केबिन स्विकारली नाही.

...म्हणून अजित दादांनी मंत्रालयातील 'ती' केबिन नाकारली
| Updated on: Dec 30, 2019 | 10:51 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार अखेर सोमवारी (30 डिसेंबर) विधानभवन परिसरात पार पडला. यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी चौथ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, उपमुख्यमंत्री झाल्यावर अजित दादांनी मंत्रालयातील सहाव्या माळ्यावरील ‘ती’ केबिन स्विकारली नाही. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील ही तीच कृषी मंत्र्यांची केबिन आहे, जिच्या अंधश्रद्धेच्या राजकीय गोष्टी गेले 5 वर्ष मंत्रालयात गाजल्या (political superstition in mantralay).

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय अंधश्रद्धेवर मोठी चर्चा सुरु आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील कृषी मंत्रालयाच्या केबिनमध्ये ज्या नेत्याची वर्णी लागते, त्याची राजकीय कारकीर्द (political superstition in mantralay) संपुष्टात येते, अशी चर्चा गेल्या पाच वर्षांपासून मंत्रलयात रंगत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही ती केबिन नाकारली, अशी चर्चा आहे.

सहाव्या मजल्यावरील त्या केबिनचा इतिहास

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर 2014 मध्ये कृषीमंत्री आणि महसूल मंत्री म्हणून एकनाथ खडसे यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर दोनच वर्षात ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर 2017 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांनी कृषी मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. मात्र, वर्षभरातच त्यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. पांडुरंग फुंडकर यांच्यानंतर भाजपचे विदर्भाचे आमदार अनिल बोंडे यांची कृषीमंत्री पदी वर्णी लागली. पण त्यानंतर अनिल बोंडे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या देवेंद्र भुयार यांच्याकडून पराभव झाला.

भाजप सरकारच्या कार्यकाळात आतापर्यंत जे कुणी कृषीमंत्री पदावर आले आहेत. त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी ते पद सोडावे लागले. तसेच त्यांची राजकीय कारकीर्द संपत आहे, अशी चर्चा मंत्रालयात आहे.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.