AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवला निवडणूकपूर्व अंदाज; म्हणाले, भारतीय प्रजासत्ताकाला ‘भयभीत प्रजासत्ताक’…

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून हा निवडणूकपूर्व अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजातून त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तर काँग्रेसलाही कानपिचक्या दिल्या आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवला निवडणूकपूर्व अंदाज; म्हणाले, भारतीय प्रजासत्ताकाला 'भयभीत प्रजासत्ताक'...
prakash ambedkar Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2023 | 12:19 PM
Share

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अजून वर्ष बाकी आहे. मात्र, त्यापूर्वीच निवडणुकीच्या संभाव्य निकालाचे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यात भाजप आणि काँग्रेसला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवला जात आहे. संपूर्ण देशाची परिस्थिती आणि राज्यनिहाय निवडणूकपूर्व अंदाज वर्तवले जात आहेत. हे अंदाज आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वेगळाच निवडणूकपूर्व अंदाज वर्तवला आहे. या अंदाजात आकडेवारी नाही. कोणता पक्ष विजयी होणार? कुणाला किती जागा मिळणार? याचा हा अंदाज नाहीये. तर निवडणुकीपूर्व देशात काय होऊ शकतं? देशाची परिस्थिती काय असू शकते? याचा अंदाज आंबेडकर यांनी वर्तवला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून हा निवडणूकपूर्व अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजातून त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तर काँग्रेसलाही कानपिचक्या दिल्या आहेत. एक प्रकारे त्यांनी भविष्यातील संकटाची माहितीच आपल्या ट्विटमधून दिली आहे. या ट्विटमध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जस जशा जवळ येतील तसे देशातील दलित आणि आदिवासी यांच्या विरोधातील अत्याचारात तसेच ओबीसी, मुस्लिम आणि महिलांवरील हिंसाचारात लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

प्ले बूकमधून हिंसाचार निघेल

द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापारातील सगळ्यात मोठ्या ठेकेदाराच्या ‘प्ले बूक’ मधून लिंचिंग, द्वेषयुक्त भाषणे, सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरवणे, दंगली – हे आणि असे बरेच काही निवडले जाईल. तसेच भाजप-आरएसएसच्या गुंडांच्या मार्फत ते राबवले जाईल, अशी भीतीही प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूकपूर्व अंदाजात व्यक्त केली आहे.

मोहब्बतचे दुकानचे तुणणे

ट्विच्या शेवटी त्यांनी भाजप-RSS ची योजना भारतीय प्रजासत्ताकाला निवडणुकीतल्या फायद्यासाठी ‘भयभीत प्रजासत्ताक’ मध्ये रूपांतरित करण्याची असल्याचा आरोप केला आहे. तसेच यादरम्यान काँग्रेस तटस्थ भूमिका घेईल आणि ‘मोहब्बत की दुकान’चे तुणतुणे वाजवत राहील, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्यांदाच असा अंदाज वर्तवला आहे. इतर निवडणूकपूर्व अंदाजाच्या पलिकडचा हा अंदाज आहे. त्यातून त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. काही गंभीर आरोपही केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.