AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र आव्हाड हे गुगल संशोधक!; ‘त्या’ विधानावरून टीकेची झोड

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आव्हाड आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड हे गुगल संशोधक!; 'त्या' विधानावरून टीकेची झोड
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jan 03, 2023 | 2:50 PM
Share

औरंगाबाद : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पण हे उत्तर देत असतानाच त्यांनी एक ट्विट केलं. त्यावरून वाद निर्माण झालाय. आव्हाडांवर टीका केली जात आहे.

जितेंद्र आव्हाड हे गुगल संशोधक आहेत, असं म्हणत मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आव्हाडांवर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड हे गुगल संशोधक आहेत, अण्णाजी दत्तो यांच्यावर राजद्रोह सिद्ध झाला. म्हणून मारले होते. मनू हा ब्राम्हण नव्हे तर क्षत्रिय होता मनुचा आणि ब्राम्हणांचा संबंध नाही, संभाजी महाराजांना जसं मारलं त्याचा मनुस्मृतीत कुठेही उल्लेख नाही, असंही महाजन म्हणालेत.

आव्हाडांच्या ज्या विधानावरून टीका होतेय ते ट्विट

राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष आहे.काँग्रेस पेक्षा जास्त मतं मुस्लिमांचे राष्ट्रवादीला जास्त मिळतात. अजित पवार किती वाचन करतात हे मला माहित नाही. अजित पवारांना वाटत असावे हिंदू धर्माला जवळचे मानले तर मुस्लिमांची मते मिळणार नाहीत. मुस्लिम मते सांभाळून ठेवण्यासाठी हा खटाटोप आहे. अजित पवारांना एका जातीचं अडवनटेज आहे त्यामुळे ते अशी वक्तव्ये करतात, असं महाजन यांनी म्हटलंय.

मुस्लिम मतांचे लांगुलचालन करण्यासाठी अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय. धर्मवीर म्हणजे नीतिमत्ता आणि कायद्याने वागणारा व्यक्ती. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यात काय अडचण आहे?, असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांनी रामसिंग यांना लिहिलेल्या पत्रात औरंगजेबाला यवन पती आहे आणि हिंदूविरोधी होते असं म्हटलं. संभाजी महाराजांनी आजोबा शहाजी भोसले यांना हिंदू धर्म जीर्णोद्धारक तर शिवाजी महाराजांना म्लेच्छ नाशक म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन मस्जिदिवर हल्ले केले आहेत, दक्षिण भारतात दोन आणि जालना इथे काद्राबाद इथे मस्जिदित घुसून हल्ला मोडून काढला होता, असंही त्यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी वैदिक पध्दतीने राज्याभिषेक करून घेतला. स्वराज्य म्हणजे हिंदूंचे राज्य होते म्हणून संभाजी महाराज धर्मवीर होते. संभाजी महाराजांच्या आधी औरंगजेब ने गोवळकोंडा आणि विजापूर या ठिकाणच्या सुलतानांना कैद केली पण त्यांना मारलं नाही फक्त संभाजी महाराज यांना मारले कारण संभाजी महाराज हिंदू होते, असंही महाजन म्हणाले आहेत.

Follow Us
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक,
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?
कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर
Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!
आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कप
Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद