AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र आव्हाड हे गुगल संशोधक!; ‘त्या’ विधानावरून टीकेची झोड

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आव्हाड आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड हे गुगल संशोधक!; 'त्या' विधानावरून टीकेची झोड
| Edited By: | Updated on: Jan 03, 2023 | 2:50 PM
Share

औरंगाबाद : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पण हे उत्तर देत असतानाच त्यांनी एक ट्विट केलं. त्यावरून वाद निर्माण झालाय. आव्हाडांवर टीका केली जात आहे.

जितेंद्र आव्हाड हे गुगल संशोधक आहेत, असं म्हणत मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आव्हाडांवर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड हे गुगल संशोधक आहेत, अण्णाजी दत्तो यांच्यावर राजद्रोह सिद्ध झाला. म्हणून मारले होते. मनू हा ब्राम्हण नव्हे तर क्षत्रिय होता मनुचा आणि ब्राम्हणांचा संबंध नाही, संभाजी महाराजांना जसं मारलं त्याचा मनुस्मृतीत कुठेही उल्लेख नाही, असंही महाजन म्हणालेत.

आव्हाडांच्या ज्या विधानावरून टीका होतेय ते ट्विट

राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष आहे.काँग्रेस पेक्षा जास्त मतं मुस्लिमांचे राष्ट्रवादीला जास्त मिळतात. अजित पवार किती वाचन करतात हे मला माहित नाही. अजित पवारांना वाटत असावे हिंदू धर्माला जवळचे मानले तर मुस्लिमांची मते मिळणार नाहीत. मुस्लिम मते सांभाळून ठेवण्यासाठी हा खटाटोप आहे. अजित पवारांना एका जातीचं अडवनटेज आहे त्यामुळे ते अशी वक्तव्ये करतात, असं महाजन यांनी म्हटलंय.

मुस्लिम मतांचे लांगुलचालन करण्यासाठी अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय. धर्मवीर म्हणजे नीतिमत्ता आणि कायद्याने वागणारा व्यक्ती. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यात काय अडचण आहे?, असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांनी रामसिंग यांना लिहिलेल्या पत्रात औरंगजेबाला यवन पती आहे आणि हिंदूविरोधी होते असं म्हटलं. संभाजी महाराजांनी आजोबा शहाजी भोसले यांना हिंदू धर्म जीर्णोद्धारक तर शिवाजी महाराजांना म्लेच्छ नाशक म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन मस्जिदिवर हल्ले केले आहेत, दक्षिण भारतात दोन आणि जालना इथे काद्राबाद इथे मस्जिदित घुसून हल्ला मोडून काढला होता, असंही त्यांनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी वैदिक पध्दतीने राज्याभिषेक करून घेतला. स्वराज्य म्हणजे हिंदूंचे राज्य होते म्हणून संभाजी महाराज धर्मवीर होते. संभाजी महाराजांच्या आधी औरंगजेब ने गोवळकोंडा आणि विजापूर या ठिकाणच्या सुलतानांना कैद केली पण त्यांना मारलं नाही फक्त संभाजी महाराज यांना मारले कारण संभाजी महाराज हिंदू होते, असंही महाजन म्हणाले आहेत.

रोहित पवारांच्या आरोपांवर प्रफुल पटेलांकडून खुलासा
रोहित पवारांच्या आरोपांवर प्रफुल पटेलांकडून खुलासा.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरणावर संभ्रम
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरणावर संभ्रम.
रोहित पवार यांच्या नव्या ट्विटने खळबळ, तो संदर्भ देत म्हणाले...
रोहित पवार यांच्या नव्या ट्विटने खळबळ, तो संदर्भ देत म्हणाले....
उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला
उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला.
सुनेत्रा पवार यांच्या बैठकांचं सत्र; विजयी उमेदवारांना भेटणार
सुनेत्रा पवार यांच्या बैठकांचं सत्र; विजयी उमेदवारांना भेटणार.
अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचयं! सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचयं! सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.
कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार
कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार.
राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरणार?
राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरणार?.
विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली! शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया
विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली! शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया.
कामं नाही केलीत तर बघतोच; गणेश नाईक पालिका अधिकाऱ्यांवर संतापले
कामं नाही केलीत तर बघतोच; गणेश नाईक पालिका अधिकाऱ्यांवर संतापले.