AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारनं सूड भावनेचा अतिरेक केला, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आक्रमक

राज्य सरकारनं सूड भावनेचा अतिरेक केला अशा शब्दात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. Pravin Darkear slams Thackeray government over governor Bhagat Singh Koshyari air travel cancel issue

ठाकरे सरकारनं सूड भावनेचा अतिरेक केला, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आक्रमक
Pravin Darekar
| Updated on: Feb 11, 2021 | 12:21 PM
Share

कोल्हापूर: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील वाद सातत्यानं उफाळून येत असतात. विधानपरिषदेच्या 12 जागांच्या नियुक्त्यांचा वाद सुरु असतानाच आणखी एक वादाचा प्रसंग पुढे आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयानं परवानगी दिली नसल्याचं कळतंय. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली. विरोधी पक्षांकडून याप्रकरणी राज्य सरकारविरोधात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारनं सूड भावनेचा अतिरेक केला, अशा शब्दात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. (Pravin Darkear slams Thackeray government over governor Bhagat Singh Koshyari air travel cancel issue)

राज्य सरकारनं अतिरेक केला

राजकारणातील मतभेद समजू शकतो, राज्यपाल घटनात्मक पद आहे. राज्य सरकारनं अतिरेक केला आहे. सूड भावना त्यांच्यामध्ये किती भरलीय हे स्पष्ट होत आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये केंद्राकडे बोट दाखवायचं. त्यांचं अपयश लोकांपुढे जाऊ नये यासाठी वाद निर्माण करायचा त्यावर लोकांचं लक्ष वळवायचं असा या सरकारचा कार्यक्रम आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

राज्यपालांची सरकारनं क्षमा मागावी, सुधीर मुनगंटीवरांची प्रतिक्रिया

राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे दमनकारी आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यानी क्षमा मागून हा विषय इथेच थांबवावा. कोणत्या अधिकाऱ्याकडून घडलं असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावं, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या सरकारनं राज्यपालांना विमानातून खाली उतरवलं आहे. त्यांना जनता सत्तेतून खाली उतरवेल, अशी आक्रमक भूमिका सुधीर मुनगंटीवारांनी मांडली आहे. सरकारनं याबाबत स्पष्टीकरण देऊन विषय संपवला पाहिजे. विमानात तांत्रिक अडचण होती हा खुलासा देऊन हा विषय संपवावा, मात्र, जाणीवपूर्वक केलं असेल तर गंभीर बाब आहे, असं सुधीर मुनंगटीवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

मला याबाबत काही माहिती नाही, मंत्रालयात जाऊन याबद्दल नक्की झालेल्या प्रकाराची माहिती घेऊन सांगणार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली, विमानातून उतरुन कोश्यारी राजभवनात

राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता तुम्हाला सत्तेतून खाली खेचेल : सुधीर मुनगंटीवार

Pravin Darkear slams Thackeray government over governor Bhagat Singh Koshyari air travel cancel issue

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.