मराठा मंत्र्यांनी समाजाचा विश्वासघात केलाय, त्यांनी जनाची नाही तर मनाची ठेवावी, राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल

भाजप (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.

मराठा मंत्र्यांनी समाजाचा विश्वासघात केलाय, त्यांनी जनाची नाही तर मनाची ठेवावी, राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल
राधाकृष्ण विखे पाटील
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 2:36 PM

अहमदगर : भाजप (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी खासदार संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजामध्ये अस्वस्थता आहे. दुसरीकडे खासदार संभाजी छत्रपती यांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता राज्य सरकारनं केली नसल्याची टीका विखे पाटील यांनी केलीय. संभाजी छत्रपती यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्याबाबत एकाही आश्वासनाची सरकारने पू्र्तता केलेली नाही. मराठा मंत्र्यांनी समाजाचा विश्वासघात केलाय. त्यांनी जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी,अशी टीका विखे पाटील यांनी केलीय. मराठा मंत्र्यांना समाजात ‌तोंड दाखवायला त्यांना जागा नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामे देवून समाजाच्या प्रश्नासोबत आहोत हे दाखवून द्यायला हवं, असं म्हटलंय.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर एकही पूर्तता ‌झाली नाही. राज्य सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केलाय. सरकारने समाजाची फसवणूक केलीय. आझाद मैदानात संभाजीराजेंनी जे आंदोलन सुरू केलय त्यास‌ माझा संपूर्ण पाठिंबा असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

शिवसेना मराठी माणूस मराठी माणूस करतेय मात्र मराठी माणसाच्या‌ भावनेच्या आधारावर त्यांनी ‌सत्ता मिळवली. तोच मराठी माणुस पूर्णपणे उद्धवस्त आणि निराधार झालाय मराठी माणसाच्या स्थितीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

अजित पवारांनी मंत्रिमंडळात राहू नये ही मराठा समाजाची भावना

अजित पवार बेजबाबदार पणे विधाने करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांच्या विधानाचा निषेधच आहे. नैतिकता शिल्लक नसल्याने ते बेजाबदार विधाने ‌करत आहेत. त्यांनी मंत्रिमंडळातच राहू नये, अशी मराठी समाजाची‌ भावना आता झालीय, असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.

इतर बातम्या:

काही बंडलबाज पोरंही जन्माला येतात, जातात तिकडेच लग्न करून सेटल होतात, अजितदादांची तुफान फटकेबाजी

अमित ठाकरेंच्या खांद्यावर ‘मनसे’ची मोठी जबाबदारी; राज यांनी साधला मराठी भाषा गौरव दिनाचा अमृतयोग!

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.