AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत राहुल गांधींचा गुजरातमध्ये मोठा दावा, म्हणाले, भाजपाने…

गुजरातमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केला आहे. भाजपाने ही निवडणूक कटकारस्थान करून जिंकली असा दावा राहुल गांधी यांनी केलाय.

महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत राहुल गांधींचा गुजरातमध्ये मोठा दावा, म्हणाले, भाजपाने...
| Updated on: Apr 09, 2025 | 5:49 PM
Share

Rahul Gandhi : काँग्रेसचे 84 वे अधिवेशन गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे पार पडले. या अधिवेशनात काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसवर सडकून टीका केली. तसेच आम्ही जातीआधारित जनगणना करण्याची मागणी केली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती मान्य केली नाही. आम्ही सत्तेत आलो की जातीआधारित जनगणेचा कायदा मंजूर करू, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच या भाषणात बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचाही उल्लेख केला. कटकारस्थान करून भाजपाने महाराष्ट्रातील निवडणूक जिंकली, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

महाराष्ट्रातील मतदारांची यादी दिली जात नाहीये- राहुल गांधी

“देश आता कंटाळला आहे. तुम्ही बघा बिहारच्या निवडणुकीत काय होतं तर. भाजपाने महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक कशा पद्धतीने जिंकली हे तुम्ही तिथे जाऊन लोकांना विचारा. आम्ही निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या मतदारांची यादी विचारत आहोत. ही यादी मागून आम्ही थकलो आहोत. पण अजूनही निवडणूक आयोग आम्हाला महाराष्ट्रातील मतदारांची यादी देत नाहीये,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच येणाऱ्या काळात देशात बदल घडणार आहे. लोकांचे मत बदलत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

देशाचा एक्सरे झाला पाहिजे- राहुल गांधी

“मला फक्त माझ्या कामात रस आहे. लोक काय म्हणतात, याने मला काहीही फरक पडत नाही. तेलंगाणात आम्ही क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. तेथे आम्ही जातीजनगणना कर आहोत. काही महिन्यांपूर्वी मी संसदेत एक भाषण केले होते. केंद्र सरकारने जातीजनगणना करावी, अशी मी मोदींकडे मागणी केली होती. या देशात दलित किती आहेत? मागस किती आहेत? मुस्लीम किती आहेत? आदिवासी किती आहेत? हे समजलं पाहिजे असं मी म्हणालो होतो. देशाचा एक्सरे झाला पाहिजे, अशी मागणी मी केली होती. पण मोदीजी, आरएसएसने आम्ही जाती जनगणना करणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

भाजपाला कोणाची किती भागिदारी, हे लपवायचंय- राहुल गांधी

“या देशात दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याकांना किती भागिदारी मिळते हे त्यांना लपवायचं आहे. लोकसभा, राज्यसभेत आम्ही जातीजनगणेबाबत कायदा मंजूर करू, असं म्ही म्हणालो होतो. तेलंगणात आम्ही हा कायदा आणला आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.