AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray on Ward | चार चार नगरसेवकांचा प्रभाग हवाच कशाला?; प्रभाग रचनेवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

Raj Thackeray on Ward | प्रभाग रचनेवरुन राज ठाकरे यांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे. चार चार नगरसेवकांचा वॉर्ड हवाच कशाला? असा टोला त्यांनी हाणला.

Raj Thackeray on Ward | चार चार नगरसेवकांचा प्रभाग हवाच कशाला?; प्रभाग रचनेवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 23, 2022 | 3:06 PM
Share

Raj Thackeray on Ward | प्रभाग रचनेवरुन (Ward Formation) सध्या राज्यात राजकारण तापलं आहे. तीन सदस्यीय, चार सदस्यीय प्रभाग रचनेवरुन येईल ते सरकार आपला-आपला अजेंडा राबवत आहे. यापूर्वीच्या सरकारचे आदेश झटकन रद्द करत दुसरे सरकार नवीन प्रभाग रचनेचा निर्णय घेत आहे. नेमचा हाच धागा पकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला शाब्दिक फटकारे लगावले. चार चार नगरसेवकांचा प्रभाग हवाच कशाला? असा सवाल राज ठाकरे यांनी मंगळवारी केला. प्रभाग रचनेवरुन सातत्याने नवनवीन निर्णय घेणाऱ्या सरकारला (State Government) धारेवर धरले. प्रभाग रचनेवरुन राज ठाकरे यांनी सरकारला जाब विचारला आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी प्रभाग रचनेवरुन तोफ डागत नागरिकांना कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचे आवाहन केले होते.

निवडणूका कधी होतील?

राज ठाकरे यांनी निवडणुका कधी होतील याविषयी भाष्य केले आहे. निवडणुका कधी होतील माहीत नाही. अग अग म्हशी हेच चालू आहे. निवडणुका कधीही लागतील. दिवाळीच्या आधी लागतील असं वाटत नाही. नोव्हेंबर, डिसेंबर कदाचित जानेवारी आणि फेब्रुवारीतही निडवणुका होऊ शकतात. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या. सगळा चिखल झालाय. कारण कोणी विचारणारा नाही, असा टोला ही त्यांनी लगावला.

चार नगरसेवकांचं गणित काय?

प्रभाग रचना आणि चार चार नगरसेवकाचं नेमकं गणित काय, याचा उलगडा राज ठाकरे यांनी केला आहे. महापालिका तीनचं की दोनचं. वॉर्डाला तीन माणसं चार माणसं कशाला? असा सवाल त्यांनी केला. लोक काय गुलाम आहेत का. त्यांना नगरसेवकही माहीत नसतं. चार चार माणसांचा प्रभाग करताय. तो भाग कोणी बघायचा. कुणाला कळत नाही. कुठे जावं. कारण लोक जाब विचारत नाही. एकदा लोकांनी ठरवलं पाहिजे. सरकारने हा नुसता खेळ मांडला आहे. लोकांना गृहित धरण्यात येत असल्याचे ते म्हणाले. तीन-चारचा एकच प्रभाग करा अशी आग्रही मागणी त्यांनी पुन्हा केली. हा सर्व प्रकार नेमका कशासाठी करण्यात येतो, हे आज लक्षात नाही आलं तरी काही वर्षानंतर लक्षात येईल. महाराष्ट्र कसा होता आणि राजकारण्यांनी त्याचं कसं मातेरं केलं ते कळेल, असे ते म्हणाले.

मुंबईतील प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरात मनसेचा पदाधिकारी मेळावा झाला. तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज ठाकरे यांच्यावर काही दिवसांआधी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज ते आज पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात बोलले.

Follow Us
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?.
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.