AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट! उद्धव ठाकरेंचं नाव न घेता म्हणाले..

Maharashtra Political Crisis : राज ठाकरेंनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर पहिल्यांदाच राजकीय घडामोडींवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

Raj Thackeray : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंची पहिली पोस्ट! उद्धव ठाकरेंचं नाव न घेता म्हणाले..
राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट...Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 30, 2022 | 1:25 PM
Share

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांच सोशल मीडियामध्ये पोस्ट केली आहे. फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट (Raj Thackeray Post on Uddhav Thackeray News) करत त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य आहे. एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वतःचं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो!, असं ते म्हणाले. हिंदीमधूनही राज ठाकरे यांनी याबाबतची पोस्ट केली आहे. हिंदीमधून राज ठाकरे यांनी याबाबतची मूळ पोस्ट केली आहे. ‘जिस दिन मनुष्य अपने सौभाग्य को ही अपना निजी कर्तृत्व मानने लगता है उस दिन से पतन का प्रवास शुरु होता है’ अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.

सरकार पडल्यानंतर पहिलीच पोस्ट

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अखेर बुधवारी रात्री उशिरा बहुमत चाचणीआधीच राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं.

वाचा राज ठाकरे यांचं ट्वीट

राजकीय भूकंपावेळी राज ठाकरे हे रुग्णालयामध्ये होते. त्याच्यावर हिपबोनची शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती. त्यानंतर या राजकीय घडामोडींच्या हायव्होल्टेज ड्राम्यादरम्यानच त्यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. रुग्णालयातून परतल्यानंतरही राज ठाकरे यांनी राजकीय घडामोडींवर कोणतंही भाष्य केलं नव्हतं. अखेर त्यांनी आज सोशल मीडियामध्ये पोस्ट टाकून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर राज ठाकरे यांनीही टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याच्या घेतलेल्या निर्णयावरही राज ठाकरेंनी वेळोवेळी आपल्या सभांमधून निशाणा साधला होता. दरम्यान, आता महाविकास आघाडी सरकार अखेर पायऊतार झालं आहे. अडीच वर्षा सत्तेत राहिल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होतंय.

बंडखोर आमदार मनसेत जाण्याची कुजबूज

दरम्यान, बंडखोर आमदार हे मनसेत जातील, अशीही कुजबूज सुरु होती. सत्ता स्थापन करण्यासाठी आमदारांना एखाद्या पक्षाची मदत घ्यावी लागू शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. दरम्यान, अखेरपर्यंत आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसेना सोडणार नाही, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी स्पष्ट केली होती.

Maharashtra Government Formation LIVE Updates : वाचा प्रत्येक घडामोड एका क्लिकवर

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.