AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे यांनी फडणवीस यांना लिहिलेलं पत्रं स्क्रिप्टचा भाग; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

राज ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं होतं. त्यात त्यांनी भाजपने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असं आवाहन केलं होतं.

राज ठाकरे यांनी फडणवीस यांना लिहिलेलं पत्रं स्क्रिप्टचा भाग; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
राज ठाकरे यांनी फडणवीस यांना लिहिलेलं पत्रं स्क्रिप्टचा भागImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2022 | 3:36 PM
Share

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना पत्रं लिहिलं. त्यानंतर भाजपचे (bjp) अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार मुरजी पटेल (murji patel)यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असतानाच उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र या निर्णयावर शंका व्यक्त केली आहे. राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेलं पत्रं हा स्क्रिप्टचा एक भाग होता, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती. त्यासाठी ते सत्र न्यायालयात आले होते. यावेळी कोर्ट परिसरात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला. राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेलं पत्रं स्क्रिप्टचा भाग होता. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपनं वैयक्ति सर्वे केला होता. ठाकरे गट मोठ्या फरकाने जिंकेल हे भाजपला कळलं होतं. पराभवाची चाहूल लागल्याने भाजपने उमेदवार मागे घेतला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राऊत यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याबाबतची घोषणा केली. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाची तयारी पूर्ण झालेली आहे. अपेक्षित मते मिळवून भाजपा ही निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत आहे. पण, एखाद्या आमदाराचे निधन झाले आणि त्यांच्या परिवारातील कोणी निवडणूक लढवत असेल तर निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्रात संस्कृती आहे. भाजपाने यापूर्वी अनेकदा असा निर्णय घेतला आहे. तसेच नव्याने निवडून येणाऱ्या आमदाराला जेमतेम एक दीड वर्ष कालावधी मिळणार आहे. त्यामुळे आज पक्षाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

हा निर्णय केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाने घेतला आहे. राज्यासाठी संवेदनशील निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचे आपण आभार मानतो, असंही ते म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं होतं. त्यात त्यांनी भाजपने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असं आवाहन केलं होतं. त्यानुसार भाजपच्या कालपासून बैठका पार पडल्या. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही याबाबत चर्चा केली. त्यानंतर दुपारी भाजपने आपला निर्णय जाहीर केला.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.