AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज ठाकरे यांचं एकनाथ शिंदे यांना पत्र! मागणी काय?

अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून राज ठाकरेंनी फडणवीसांना विनंती पत्र लिहिलं होतं, त्यानंतर आता शिंदेंना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय?

देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज ठाकरे यांचं एकनाथ शिंदे यांना पत्र! मागणी काय?
राज ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना पत्रImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 20, 2022 | 2:41 PM
Share

ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Letter) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. पत्रातून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची मागणी केली. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thacleray News) यांनी केली आहे. पत्र ट्वीट करुन राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती केलीय.

याआधीचा अनुभव पाहता, सरकार पंचनाम्याचे आदेश देतं. पण प्रशासकीय पातळीवर पंचनामे नीट होत नाही आणि गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहते. त्यामुळे या परिस्थितीचा सरकारने युद्धपातळीवर आढावा घ्यावा आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

लॉकडाऊननंतर शेतकऱ्यांचीही दिवाळी धूमधडाक्यात करण्यासाठी सरकारने कटाक्षानं लक्ष द्यावं, अशी विनंती राज ठाकरे यांनी केलीय. तसंच प्रतिहेक्टरी जेवढी नुकसान भरपाई दिली जाते, ती पुरेशी नसल्याचंही उल्लेख त्यांनी यावेळी केलाय.

राज ठाकरेंचं संपूर्ण पत्र

फडणवीसांनी ऐकलं, शिंदेही ऐकणार?

अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून राज ठाकरेंनी फडणवीसांना विनंती पत्र लिहिलं होतं, त्यानंतर आता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रानंतर भाजपने आपला उमेदवार अंधेरी पोटनिवडणुकीतून मागे घेतला होता. आता एकनाथ शिंदे राज ठाकरे यांनी केलेल्या विनंतीबाबत सकारात्मक निर्णय घेणार का, हे पाहणं महत्त्वाचंय.

शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत

राज्यात परतीचा पाऊस लांबला होता. त्यामुळे अनेक भागाला लांबलेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घासही हिरावला गेल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रतही पावसामुळे शेतीला फटका बसलाय. यामुळे शेतकरी हवालदिल झालेत.

दरम्यान, आज मंत्रिमंडळाची बैठकही पार पडली. या बैठकीतही शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही देण्यात आलेत.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय सरकारने याआधीच घेतल्यांच मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे वेळेत होऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल, यासाठी आवश्यक बाबी आणि उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.