Raj Thackeray : पुण्यातील राजकीय वातावरण तापणार! राज ठाकरेंचा 16 एप्रिलला दौरा, सामुहिक हनुमान चालीसा पठण होणार

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज यांच्या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात येतेय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता 16 एप्रिलला पुणे दौऱ्यावर जात आहेत. इतकंच नाही तर राज यांच्या दौऱ्यावेळी सामुहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

Raj Thackeray : पुण्यातील राजकीय वातावरण तापणार! राज ठाकरेंचा 16 एप्रिलला दौरा, सामुहिक हनुमान चालीसा पठण होणार
राज ठाकरे, अध्यक्ष, मनसेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 11:09 PM

पुणे : मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. इतकंच नाही तर महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिलाय. त्याचबरोबर मशिदींवरील भोंग्यांसमोर (loudspeaker on Mosque) लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचे आदेशच त्यांनी मनसैनिकांना दिलेत. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज यांच्या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात येतेय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता 16 एप्रिलला पुणे दौऱ्यावर जात आहेत. इतकंच नाही तर राज यांच्या दौऱ्यावेळी सामुहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

पुण्यातील वातावरण तापणार

राज्यातील राजकारण तापलेलं असताना आणि राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसकडून मनसेवर जोरदार हल्ला चढवला जात असताना राज ठाकरे यांचा पुणे दौरा घोषित करण्यात आलाय. राज ठाकरे 16 एप्रिलला पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. राज यांच्या दौऱ्यावेळी सामुहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. खालकर चौक मारुती मंदिराजवळ हा कार्यक्रम होणार असून, मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आणि कार्यकर्त्यांना हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिल्यानंतर पुण्यात अशाप्रकारचा सामुहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण आता अधिक तापण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंचा सरकारला अल्टिमेटम

ठाण्यातील उत्तरसभेतही राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना तीव्र विरोध केला. राज्य सरकारला इशारा देत राज ठाकरे म्हणाले की, येत्या 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला माझी विनंती आहे की, कुठचीही तेढ, दंगल आम्हाला करायची नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही. पण आज 12 तारीख आहे. 3 मेपर्यंत महाराष्ट्राच्या सगळ्या मशिदींच्या मौलवींना बोलवा. त्यांची बैठक घ्या. त्यांना सांगा.. लाऊडस्पीकर उतरवा. 3 तारखेपर्यंत आमच्याकडून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. जर 3 तारखेपर्यंत भोंगे उतरवले नाही तर आम्ही हनुमान चालिसा सुरू करू.

इतर बातम्या :

Nitin Gadkari on RSS : रतन टाटा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं रुग्णालय, नितीन गडकरींनी सांगितला एक खास किस्सा

Kirit Somaiya : ‘महाविकास आघाडीचा नवा घोटाळा उद्या उघड करणार’, सोमय्या कोणता बॉम्ब फोडणार?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.