AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर राज ठाकरे यांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, लावा बांबू…

लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. निवडणुकीच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरे यांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, लावा बांबू...
मनसे अध्यक्ष राज ठाकरेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 24, 2024 | 2:33 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका विधानावर मिश्किल टिप्पणी केली आहे. काही लोकांना बांबू लावण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्याबाबत राज ठाकरे यांना विचारलं असता मग लावा म्हणा, असं मश्किल उत्तर राज ठाकरे यांनी दिलं. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी राज्यातील राजकीय वातावरण आणि मनसेच्या स्ट्रॅटेजीवर चर्चा झाली. तसेच पदाधिकाऱ्यांचं म्हणणंही यावेळी राज ठाकरे यांनी ऐकून घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. निवडणुकीच्या दृष्टीने आजची बैठक होती. या बैठकीमध्ये नेते मंडळींना कामं दिलेली आहेत, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. राज्यात विकासाचे मुद्दे हायलाईट केले जात नाहीत, तुम्ही हे प्रश्न निवडणुकीत मांडणार आहात का? असं राज ठाकरे यांना विचारण्यात आलं. त्यावर राज ठाकरेंनी प्रश्न विचारणाऱ्याचीच फिरकी घेतली. मला वाटतं मी आता युक्रेन आणि रशिया वॉरचा निवडणुकीत प्रचार करेल. महाराष्ट्राचेच प्रश्न येतील ना हो… असं राज म्हणाले.

समाजाने ही गोष्ट ओळखावी

सध्या राज्यात जातीजातीत तेढ निर्माण केली जात आहे. राजकारणीच हे काम करत आहेत, असंही त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याचा अर्थ त्यांना विकासापेक्षा जातीपातीत तेढ निर्माण करायची आहे. त्यातून हाताला मते लागतात हे त्यांना कळलंय म्हणून हे त्या प्रकारे पुढे जात आहेत. समाजाने ही गोष्ट ओळखली पाहिजे, असंही राज यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला होता. बांबू कार्बनडाय ऑक्साईड जास्त शोषून घेतो. आणि भरपूर ऑक्सिजन सोडतो. बांबूचे अनेक फायदे आहेत. त्याचे अनेक प्रोडक्ट्स आहेत, त्याचा विचार करू शकत नाही. त्यामुळे काही लोकांना बांबू पण लावला पाहिजे. काही लोकं आहेत. सकाळीच भोंगा वाजतो. बरोबर ना, असा चिमटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला होता.

भोंग्याला बांबू लावला पाहिजे

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. सकाळच्या भोंग्याला बांबू लावला पाहिजे. भोंगा वाजल्यानंतर लोक चॅनल बदलायला लागले आहेत. शरद पवार आणि काँग्रेसने तुम्हाला बांबू लावला आहे. दुसऱ्यांचे बांबू बघू नका, तुमच्याकडे आला तर त्रास होईल, असं सांगतानाच लोकसभा निवडणुकीत उबाठा गटाला बांबू लागला. आमचा स्ट्राईक रेट त्यांच्यापेक्षाही चांगला आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता