AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray Sabha : ‘वसंत सेना ते शरद सेना असा प्रवास करणाऱ्यांनी आमच्याबद्दल बोलू नये ‘, संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला

संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. 'शिवसैनिकांना वसंत सेना म्हटलं जायचं. तेव्हाची वसंत सेना ती आताची शरद सेना असा यांचा मोठा प्रवास आहे. त्यामुळे त्यांनी आमच्याबद्दल बोलायचं नाही, असा टोला संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय.

Raj Thackeray Sabha : 'वसंत सेना ते शरद सेना असा प्रवास करणाऱ्यांनी आमच्याबद्दल बोलू नये ', संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला
संदीप देशपांडे यांची आदित्य ठाकरेंवर टीकाImage Credit source: TV9
| Updated on: Apr 12, 2022 | 7:24 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज ठाण्यात उत्तर सभा होत आहे. या सभेत बोलताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. आम्ही संपलेल्या पक्षाबाबत मी उत्तर देत नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मनसेला जोरदार टोला लगावला होता. त्यावर संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. ‘शिवसैनिकांना वसंत सेना म्हटलं जायचं. तेव्हाची वसंत सेना ती आताची शरद सेना असा यांचा मोठा प्रवास आहे. त्यामुळे त्यांनी आमच्याबद्दल बोलायचं नाही, असा टोला संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना लगावलाय.

‘आदित्य ठाकरे म्हणाले की संपलेल्या पक्षांवर मी बोलत नाही. जरा शिवसेनेचा इतिहास आपण तपासून घ्या. याच शिवसेनेला वसंतसेना असं म्हटलं जायचं. वसंत सेना का म्हटलं जायचं? तर वसंतरावांनी त्या शिवसेनेला पुनर्जीवन दिलं होतं. मुंबई महाराष्ट्रापेक्षा वेगळी केली जाईल, असं सांगून, असं एक वक्तव्य करुन शिवसेनेला पुनरुर्जीवित करण्याचं काम वसंतरावांनी केलं, म्हणून तेव्हा वसंत सेना असं म्हटलं गेलं. तर त्यावेळची वसंतसेना ती आताची शरदसेना असा ज्यांचा मोठा प्रवास आहे, त्यांनी आमच्याबद्दल नाही बोलायचं. तुमच्यामध्ये तर स्पर्धा चालली आहे. काँग्रेस म्हणते सेना आमची बी टीम, राष्ट्रवादी म्हणतं आमची बी टीम. म्हणजे तुम्ही डोळा एकाला मारलं, प्रेम एका बरोबर केलं. लग्न एकाबरोबर आणि हनिमून चौथ्या बरोबर केलं आणि तुम्ही आम्हाला विचारणार प्रश्न? राजसाहेबांनी जी भूमिका घेतली ती ठामच घेतली आहे. त्यासाठी आम्ही कुणाचे दोन पैशाचे मिंदे नाही’, असं संदीप देशपांडे म्हणाले.

‘येत्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना संपलेली दिसेल’

शिवसेना हनुमान चालीसा लावल्यानंतर कधी डिवचायला लागली. मी हे समजू शकतो की कुठल्या तरी दुसऱ्या धर्माचं काहीतरी केलं, वेगळं काहीतरी केलं तर मी समजू शकतो. पण हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र लावलं की तुम्ही डिवचले जात असाल, म्हणजे तुमचा भगवा रंग शंका घेण्यासारखा आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्हा संपवायला निघालेले आहात, अशी जोरदार टीकाही देशपांडे यांनी शिवसेनेवर केलीय. तसंच येत्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना संपलेली दिसेल, असा दावाही त्यांनी केलाय.

‘आमची मुंब्राची म्हैस’

संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरही निशाणा साधला. मुंब्र्याची म्हैस असा उल्लेख करत देशपांडे यांनी आव्हाडांवर जोरदार हल्ला चढवला. ‘मी राजसाहेबांना हात जोडून विनंती करतो की दंगली भडकवू नका. तू आम्हाला शिकवणार? इशरज जहाला पाठिंबा देणार तुम्ही. अहजर गुरुली फाशी देऊ नका म्हणून पाठिंबा देणार तुम्ही, तुम्ही आम्हाला सांगणार दंगली भडकवू नका म्हणून… आम्ही सगळे प्रभ श्रीरामचंद्राचे सैनिक आहोत. आमच्या शेपटीला आग लावम्याचा प्रयत्न करु नका. तुमची लंका जाळल्याशिवाय राहणार नाही. आमचं आव्हान आहे समोरासमोर या मग बघू, असा इशाराच संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलाय.

इतर बातम्या : 

ST Workers Strike : एसटी कामगारांकडून केलेल्या वसुलीतून पडळकर, खोतांचा हिस्सा किती? अतुल लोंढेंचा सवाल

UP MLC Election Result 2022 : चक्क वाराणसीत भाजप उमेदवाराची जमानत जप्त, माफियाच्या पत्नीला आमदारकी, यूपीत उलटफेर!

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.