AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC Reservation : राज ठाकरे म्हणतात निर्णयाचे स्वागत, ओबीसी आरक्षणावर पहिली प्रतिक्रिया

आता ओबीसी आरक्षणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ही पहिली प्रतिक्रिया आहे. त्यांनी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.

OBC Reservation : राज ठाकरे म्हणतात निर्णयाचे स्वागत, ओबीसी आरक्षणावर पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे म्हणतात निर्णयाचे स्वागत, ओबीसी आरक्षणावर पहिली प्रतिक्रियाImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jul 20, 2022 | 5:41 PM
Share

मुंबई : राज्याच्या राजकारणात आज अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी आरक्षण (OBC Reservation) पुन्हा मिळवण्यासाठी राज्य सरकारचा सुप्रीम कोर्टात संघर्ष चालला होता. त्या संघर्षाला आज यश आले आहे, आगामी निवडणुका या आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसी आरक्षणासह घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाला हा एक सुखद धक्का आहे. मात्र या निर्णयानंतर लगेच राजकीय आरोप प्रत्यारोप आणि श्रेयवाद सुरू झाला. भाजप म्हणायला लागलं की हे आरक्षण आमच्यामुळेच मिळालं तर महाविकास आघाडी म्हणायला लागली की हा आयोग आमच्या काळात स्थापन झाला होता. त्यातच आता ओबीसी आरक्षणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ही पहिली प्रतिक्रिया आहे. त्यांनी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर ट्विट करत लिहिले आहे की “स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे.” अशा आशयाचे ट्विट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

राज ठाकरे यांचं ट्विट

आरोप प्रत्यारोप आणि श्रेयवादही रंगला

अनेक वेळा अपयश आल्यानंतर इम्पेरिकल डेटावरून आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर राज्य सरकारने पुन्हा नवा आयोग नेमत तातडीने पुन्हा नवा डेटा संकलन करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच हा नवीन तयार केलेला डेटा अलीकडेच सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला. त्यावरतीच या महत्त्वपूर्ण सुनावण्या पार पडत आहेत आणि त्याचमुळे आगामी निवडणुकीत ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र त्यासाठी काही अटींचे पालन हे राज्य सरकारला करावं लागणार आहे. काही तातडीचा डेटा हा सुप्रीम कोर्टात राज्य सरकारला सादर करावा लागणार आहे. तो डेटा सविस्तर सादर केल्यानंतरच ओबीसी आरक्षणाचा मार्ग आणखी सुखर होणार आहे, मात्र सध्या जरी यावर सर्वत्र जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?