AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात : अबू आझमी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेला आले. नको त्या विषयावर राजकारण झालं आणि वाद-विवाद देखील झाले. मात्र आता प्रचारतोफा थंडावल्या आहेत आणि शेवटच्या टप्पाच्या मतदानानंतर सर्वांचं लक्ष असणार आहे निकालाकडे. महाराष्ट्रात युती, आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि सपा-बसपानेही निवडणूक लढवली. सपाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार […]

राज ठाकरे प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात : अबू आझमी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेला आले. नको त्या विषयावर राजकारण झालं आणि वाद-विवाद देखील झाले. मात्र आता प्रचारतोफा थंडावल्या आहेत आणि शेवटच्या टप्पाच्या मतदानानंतर सर्वांचं लक्ष असणार आहे निकालाकडे. महाराष्ट्रात युती, आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि सपा-बसपानेही निवडणूक लढवली. सपाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. शिवाय त्यांनी भाजपवरही निशाणा साधलाय. राज ठाकरेंचा पक्ष संपला असून ते प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात, असा आरोप अबू आझमींनी केला.

राज यांच्या सभांचा महाराष्ट्रात भाजपविरोधी वातावरण तयार करण्यात फायदा होईल, असं अबू आझमी म्हणाले. राज ठाकरेंमुळे परप्रांतियांना मारहाण झाली होती हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी विसरले आहेत. राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे काँग्रेस आणि महागठबंधनला राज्याच्या बाहेर नुकसान होईल, असा दावाही त्यांनी केला. राज ठाकरे हे मिमिक्री आर्टिस्ट आहेत. मेहमूद आणि असरानी यांच्यासारख्या कलाकारांना लोक ऐकायचे तसं राज ठाकरेंना लोक ऐकतात. राज ठाकरे सर्व प्रकरणात सेटलमेंट करतात, त्यांचा पक्ष संपलाय, असा घणाघात अबू आझमींनी केला.

अबू आझमी यांनी भाजपवरही सडकून टीका केली. देशात 100 टक्के भाजपच्या विरोधात वातावरण असल्याचं ते म्हणाले. भाजपच्या पापांचा घडा भरलेला आहे. निवडणूक आयोगानेही भाजपात प्रवेश केलाय आणि कार्यकर्त्यांसारखं काम केलं जातंय. उत्तर प्रदेशात भाजपला 50 टक्के नुकसान होईल, असा आरोप त्यांनी केला.

भाजपकडून दबावतंत्र वापरलं जात असल्याचा आरोप अबू आझमींनी केला. शिवाय देशातील मुसलमानांना विनाकारण जेलमध्ये टाकलं जातं आणि पुरावेही मागितले जात नाहीत. पण साध्वी प्रज्ञासिंगच्या अटकेनंतर पुरावे मागितले जातात, असं म्हणत अबू आझमींनी साध्वीच्या वक्तव्यावरही जोरदार टीका केली.

VIDEO :

Follow Us
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका