AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये; राजू शेट्टींची खोचक टीका

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. (raju shetti slams pm narendra modi over farmer agitation)

मोदींनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये; राजू शेट्टींची खोचक टीका
| Updated on: Dec 15, 2020 | 5:14 PM
Share

कोल्हापूर: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारला बळाचा वापर करून शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढायचं आहे. पण सरकारने शेतकऱ्याच्या रक्ताने स्वत:चे हात रंगवून घेऊ नये, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये, असं राजू शेट्टी म्हणाले. (raju shetti slams pm narendra modi over farmer agitation)

प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी ही टीका केली. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या चारही बाजूंना वेढा घातला आहे. लाखो शेतकरी हजारो वाहने घेऊन दिल्लीत आले आहेत. त्यांची दिल्लीतून परत जाण्याची मानसिकता नाही. हे आंदोलन कोणत्याही एका पक्षाच्या किंवा संघटनेच्या हातात राहिलेलं नाही. शेतकऱ्यांचा हा रोष कमी करायचा असेल तर कृषी कायदे मागे घेतले पाहिजे, असं शेट्टी म्हणाले.

शेतकऱ्यांना डिवचू नये

शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. त्यासाठी त्यांना कायदेशीर ग्वाही दिली पाहिजे, असं सांगतानाच सर्वस्तरातील लोक दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. त्यांना डिवचू नये. केंद्र सरकारचे लक्षण ठिक दिसत नाही. त्यांना हे आंदोलन मोडीत काढायचं आहे. त्यासाठी बळाचा वापर करायचा आहे. पण सरकारने शेतकऱ्यांच्या रक्ताने हात रंगवून घेऊ नये. मोदींनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये, असं राजू शेट्टी म्हणाले.

भाजपला सत्ता गमवावी लागली होती

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर या आंदोलनाचा उद्रेक होऊ शकतो. त्याची प्रतिक्रिया देशभर उमटू शकते, असं सांगतानाच मध्य प्रदेशात 2017 रोजी शेतकऱ्यांवर गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाजपला तीन राज्यातील सत्ता गमवावी लागली होती. सरकारने हे विसरू नये. या सरकारने आता अदानी आणि अंबानी यांच्या घरात तेवढं पाणी भरायचं शिल्लक बाकी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

दानवे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी

भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनावर केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. दानवे यांची टीका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. केंद्रीय मंत्र्याकडे सर्व माहिती असते. तरीही त्यांनी या आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा बेछूट आरोप केला. अशा नेत्याला मतदान केल्याचं जालन्यातील शेतकऱ्यांना तरी पटतं का? असा सवालही त्यांनी केला. (raju shetti slams pm narendra modi over farmer agitation)

संबंधित बातम्या:

नाशिक पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनीती, राऊतांचा विश्वासू नेता महानगरप्रमुख

LIVE UPDATES : केंद्राने 30 हजार 537 कोटी अजून दिलेले नाहीत : अजित पवार

शेतकऱ्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षांची बंदूक : पंतप्रधान मोदी

(raju shetti slams pm narendra modi over farmer agitation)

Follow Us
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन...
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन....
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल.
पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह.......
पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह........
NEET पेपरफुटी प्रकरणी नाशिक ठाण्यानंतर आणखी एका नामांकित शहराचं नाव सम
NEET पेपरफुटी प्रकरणी नाशिक ठाण्यानंतर आणखी एका नामांकित शहराचं नाव सम.