AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणूक लढवणार का? राजू शेट्टी म्हणतात….

स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. शिवाय आपण स्वतः निवडणूक लढवणार नसल्याचंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय स्वाभिमानीच्या कार्यकारिणीत घेण्यात आलाय.

विधानसभा निवडणूक लढवणार का? राजू शेट्टी म्हणतात....
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 03, 2019 | 6:42 PM
Share

पुणे : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीसोबत असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधानसभा निवडणुकीत 49 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय. स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. शिवाय आपण स्वतः निवडणूक लढवणार नसल्याचंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाची 2 आणि 3 जुलै रोजी दोन दिवसाची राज्य कार्यकारणी झाली. या कार्यकारिणीत विविध ठराव मंजूर करण्यात आले. यामध्येच आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी 49 जागा लढवणार असल्याचाही ठराव पास करण्यात आला.

शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा, विज बिल माफ करावं अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. येत्या तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी विविध पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेमधून राजू शेट्टी यांचा शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी पराभव केला होता. त्यामुळे यावेळी राजू शेट्टी विधानसभा लढवणार का याकडे लक्ष लागलं होतं. अखेर त्यांनी विधानसभा लढण्याबाबतचं मत स्पष्ट केलंय.

स्वाभिमानीच्या कार्यकारिणीत मंजूर करण्यात आलेले ठराव

महाराष्ट्राचा कृषी क्षेत्राचा आर्थिक वेग उणे 8% खालावलेला आहे. शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी विनाअट सरसकट सात बारा कोरा करावा आणि शेतीचं संपूर्ण वीज बिल माफ करावं. याची मागणी सरकारकडे करण्यात येईल.

खरीपाच्या पेरण्या संपत आल्या तरी अद्यापही केंद्र सरकारने खरीपाचे हमीभाव जाहिर केलेले नाहीत. यामुळे सरकारची अनास्था दिसून येते. केंद्र सरकारने तात्काळ स्वामिनाथन यांच्या सूत्रानुसार हमीभाव जाहीर करावा. (केंद्र सरकारकडून आजच्या बैठकीत हमीभावांची घोषणा करण्यात आली आहे.)

दुष्काळ हाच निकष धरून ज्या जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे, त्या जिल्ह्यातील पीक विमा भरणा केलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची जोखीम रक्कम तात्काळ द्यावी.

20 जुलैच्या आत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना खरीपासाठी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यास बँकाना आदेश द्यावेत. ज्या ठिकाणी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असतील त्या ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं.

सतिश सुंदरराव सोनवणे मु. पो. आदेगांव ता. माजलगांव जि. बीड या शेतकऱ्याने लोकमंगल माऊली शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्यास ऊस पुरविला होता. अनेक हेलपाटे घालूनही ऊस बिल मिळाले नाही म्हणून त्या शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. हा कारखाना सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांच्या कुटुंबीयांचा आहे म्हणून पोलिसांनी कारखान्याच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करणे टाळले. याबाबत मुख्यमंत्री यांनी संबधितावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून सुभाष देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.

राज्य सरकारने दुधाच्या प्लॅस्टीक बंदीचा फेरविचार करावा, यामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघांचे नुकसान होणार आहे.

केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात प्रोत्साहन बंद केल्याने कांद्याचे दर प्रतिक्विंटल 400 रूपयाने कोसळले आहेत. केंद्राने ताबडतोब निर्यात अनुदान चालू करावे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...