AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आंबेडकरांशिवाय वंचितच्या एकाही उमेदवाराला लाखभर मतेही मिळणार नाहीत’

सोलापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांवर सडकून टीका केली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सोडले, तर उरलेल्या वंचितच्या एकाही उमेदवाराला लाखभर मते देखील मिळणार नाहीत, अशी जोरदार टीका आठवलेंनी केली. ते सोलापूरच्या दुष्काळ दौऱ्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवारांच्या ईव्हीएमबाबतच्या मताशी सहमत […]

‘आंबेडकरांशिवाय वंचितच्या एकाही उमेदवाराला लाखभर मतेही मिळणार नाहीत’
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

सोलापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांवर सडकून टीका केली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सोडले, तर उरलेल्या वंचितच्या एकाही उमेदवाराला लाखभर मते देखील मिळणार नाहीत, अशी जोरदार टीका आठवलेंनी केली. ते सोलापूरच्या दुष्काळ दौऱ्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवारांच्या ईव्हीएमबाबतच्या मताशी सहमत : रामदास आठवले

रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ईव्हीएमबाबतच्या मताशी सहमत असल्याचे म्हटले. मात्र, त्याचवेळी त्यांनी पवारांना उपरोधात्मक टोलाही लगावला. आठवले म्हणाले, “शरद पवार यांच्या ईव्हीएमबाबतच्या मताशी मी सहमत आहे. कारण काही ठिकाणी कमळाऐवजी राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान झाले आहे. ईव्हीएम काँग्रेसच्या काळातील आहेत. त्यामुळे सर्व मशिन खराब असू शकत नाहीत.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवारांनी केलेल्या टीकेवर आठवले यांनी मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, “शरद पवारांच्या मते फडणवीस सरकार अनुभवी नसेल, तर फडणवीस सरकारला आणखी 5 वर्षे द्यायला हवीत.”

पवारांच्या सरकारने खूप काम केलं, मग महाराष्ट्र कोरडा का?

दुष्काळाबाबत आठवलेंनी पवारांनाच लक्ष्य केले. शरद पवार हे अनुभवी आहेत. त्यांच्या सरकारने खूप कामे केले आहे. मग तरीही महाराष्ट्र कोरडा कसा? असा थेट सवाल आठवलेंनी विचारला. त्यामुळे दुष्काळाला काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोकसभेच्या निकालावर बोलताना ते म्हणाले, “महायुतीला महाराष्ट्रात 37 ते 38 जागा मिळतील. सोलापूरची जागा महायुतीकडेच राहिल. देशात युपीएच्या काही जागा वाढतील. काही कमी होतील. मात्र, भाजप 260 पेक्षा जास्त जागा जिंकून सत्ता स्थापन करेल.”

Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.