AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेसला जोडण्याचं काम करावं, रामदास आठवले यांचा सल्ला

या यात्रेत गर्दी होतेय. कारण लोक त्यांना पाहायला येतायत. या यात्रेचा काही फायदा होणार नाही.

राहुल गांधी यांनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेसला जोडण्याचं काम करावं, रामदास आठवले यांचा सल्ला
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 19, 2022 | 3:33 PM
Share

पुणे : सावरकर यांच्यावर टीका करणं योग्य नाही. वैचारिक मतभेद असू शकतात. परंतु, अशाप्रकारे टीका करून वेगळी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. अशा पद्धतीची टीका करणं योग्य नाही. राहुल गांधी यांनी भारत जोडण्यापेक्षा राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाला जोडण्याचं काम करावं, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते. काँग्रेस ही खिळखिळ झाली आहे. त्या काँग्रेसला मजबूत करणं आवश्यक आहे. काँग्रेसची अवस्था ना घरकी ना घाट की, अशी झाली आहे.

पिंपरी येथे बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्य वीर सावरकर हा वाद करू नये.  टीका करून कुणाच्या भावना दुखवू नयेत असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनाचे पिंपरी मध्ये उद्घाटन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रतिसाद मिळतोय. पण त्याचे मतात परिवर्तन होणार नाही. ही भारत जोडो नाही भारत तोडो यात्रा आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.

समाजात तेढ निर्माण करणारी ही यात्रा असल्याचे ही ते म्हणाले. या यात्रेत गर्दी होतेय. कारण लोक त्यांना पाहायला येतायत.  या यात्रेचा काही फायदा होणार नाही.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशामध्ये भाजप जिंकणार, असा दावाही आठवले यांनी केला. राज ठाकरे यांच्याबरोबर भाजपच्या युतीला विरोध असल्याचा पुनरुच्चार आठवले यांनी केला.

गुजरातमध्ये भाजपला फायदा होणार आहे. गुजरातची जनता ही मोंदी यांच्या पाठीशी उभी राहील. राहुल गांधी यांची यात्रा ही समाजात फूट पाडण्याचं काम या माध्यमातून करणार, असा आरोप असल्याचं रामदास आठवले म्हणाले.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान