AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेसला जोडण्याचं काम करावं, रामदास आठवले यांचा सल्ला

या यात्रेत गर्दी होतेय. कारण लोक त्यांना पाहायला येतायत. या यात्रेचा काही फायदा होणार नाही.

राहुल गांधी यांनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेसला जोडण्याचं काम करावं, रामदास आठवले यांचा सल्ला
| Edited By: | Updated on: Nov 19, 2022 | 3:33 PM
Share

पुणे : सावरकर यांच्यावर टीका करणं योग्य नाही. वैचारिक मतभेद असू शकतात. परंतु, अशाप्रकारे टीका करून वेगळी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. अशा पद्धतीची टीका करणं योग्य नाही. राहुल गांधी यांनी भारत जोडण्यापेक्षा राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाला जोडण्याचं काम करावं, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते. काँग्रेस ही खिळखिळ झाली आहे. त्या काँग्रेसला मजबूत करणं आवश्यक आहे. काँग्रेसची अवस्था ना घरकी ना घाट की, अशी झाली आहे.

पिंपरी येथे बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्य वीर सावरकर हा वाद करू नये.  टीका करून कुणाच्या भावना दुखवू नयेत असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनाचे पिंपरी मध्ये उद्घाटन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रतिसाद मिळतोय. पण त्याचे मतात परिवर्तन होणार नाही. ही भारत जोडो नाही भारत तोडो यात्रा आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.

समाजात तेढ निर्माण करणारी ही यात्रा असल्याचे ही ते म्हणाले. या यात्रेत गर्दी होतेय. कारण लोक त्यांना पाहायला येतायत.  या यात्रेचा काही फायदा होणार नाही.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशामध्ये भाजप जिंकणार, असा दावाही आठवले यांनी केला. राज ठाकरे यांच्याबरोबर भाजपच्या युतीला विरोध असल्याचा पुनरुच्चार आठवले यांनी केला.

गुजरातमध्ये भाजपला फायदा होणार आहे. गुजरातची जनता ही मोंदी यांच्या पाठीशी उभी राहील. राहुल गांधी यांची यात्रा ही समाजात फूट पाडण्याचं काम या माध्यमातून करणार, असा आरोप असल्याचं रामदास आठवले म्हणाले.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....