AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेसला जोडण्याचं काम करावं, रामदास आठवले यांचा सल्ला

या यात्रेत गर्दी होतेय. कारण लोक त्यांना पाहायला येतायत. या यात्रेचा काही फायदा होणार नाही.

राहुल गांधी यांनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेसला जोडण्याचं काम करावं, रामदास आठवले यांचा सल्ला
| Edited By: | Updated on: Nov 19, 2022 | 3:33 PM
Share

पुणे : सावरकर यांच्यावर टीका करणं योग्य नाही. वैचारिक मतभेद असू शकतात. परंतु, अशाप्रकारे टीका करून वेगळी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. अशा पद्धतीची टीका करणं योग्य नाही. राहुल गांधी यांनी भारत जोडण्यापेक्षा राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाला जोडण्याचं काम करावं, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते. काँग्रेस ही खिळखिळ झाली आहे. त्या काँग्रेसला मजबूत करणं आवश्यक आहे. काँग्रेसची अवस्था ना घरकी ना घाट की, अशी झाली आहे.

पिंपरी येथे बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्य वीर सावरकर हा वाद करू नये.  टीका करून कुणाच्या भावना दुखवू नयेत असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनाचे पिंपरी मध्ये उद्घाटन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रतिसाद मिळतोय. पण त्याचे मतात परिवर्तन होणार नाही. ही भारत जोडो नाही भारत तोडो यात्रा आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.

समाजात तेढ निर्माण करणारी ही यात्रा असल्याचे ही ते म्हणाले. या यात्रेत गर्दी होतेय. कारण लोक त्यांना पाहायला येतायत.  या यात्रेचा काही फायदा होणार नाही.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशामध्ये भाजप जिंकणार, असा दावाही आठवले यांनी केला. राज ठाकरे यांच्याबरोबर भाजपच्या युतीला विरोध असल्याचा पुनरुच्चार आठवले यांनी केला.

गुजरातमध्ये भाजपला फायदा होणार आहे. गुजरातची जनता ही मोंदी यांच्या पाठीशी उभी राहील. राहुल गांधी यांची यात्रा ही समाजात फूट पाडण्याचं काम या माध्यमातून करणार, असा आरोप असल्याचं रामदास आठवले म्हणाले.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.