AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण”: रामदास आठवले

धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय हे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. (Ramdas Athawale criticize Thackeray govt for delay in religious places reopening )

धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण: रामदास आठवले
| Updated on: Nov 15, 2020 | 5:51 PM
Share

मुंबई : राज्यातील सर्व धार्मिक स्थळं भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. या निर्ण्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेत्यांनंतर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी देखील यानिमित्तानं राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण” असल्याचा आरोप आठवले यांनी केला. (Ramdas Athawale criticize Thackeray govt for delay in religious places reopening )

पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जाहीर केले. रामदास आठवले यांनी राज्य सरकारच्या निर्णयावरुन राज्यावर निशाणा साधला असला तरी स्वागत देखील केलं आहे. “सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. तरीही या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो”.असं आठवले म्हणाले आहेत.

“सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी रिपाइंने राज्यभर आंदोलन केले होते”, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.  कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळं मार्च महिन्यापासून बंद होती. धार्मिक स्थळं भाविकांना दर्शन घेण्यासाठी खुली करावीत या मागणीसाठी विविध राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्यात आले होते.

मंदिरं खुली करण्याच्या निर्णयावरुन आरोप प्रत्यारोप 

प्रवीण दरेकरांनी ठाकरे सरकारला मंदिर उघडण्याच्या निर्णयावरुन खडे बोल सुनावले. या सरकारनं हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. मात्र केवळ भाजप आंदोलकांना, पुजाऱ्यांना वारकऱ्यांना सपोर्ट करते. म्हणून अहंकारातून त्यांना मदत करायची नाही, या इगोपोटी हा निर्णय रखडवला होता, अशी टीकाही प्रवीण दरेकरांनी केली आहे.

भाजप नेत्यांच्या आरोपाला महाविकासआघाडीतील नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देत राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन करण्यात आले.  कोरोनाचा धोका असतानाही राज्यातील मंदिरे सुरु करण्यासाठी भाजपकडून मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणला जात होता. मात्र, या दबावाला उद्धव ठाकरे बळी पडले नाहीत. वेळ आल्यावर टप्याटप्याने मी सर्वकाही सुरु करेन, हा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळला. याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने उद्धव ठाकरे यांचे आभार मानत असल्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगतिले.

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक केले आहे. “मंदिरं उघडायला उशीर झाला आहे, असं विरोधक म्हणत असतील पण तसं म्हणता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळी मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतलाय, कोरोना काळात जनतेचा विचार करुन निर्णय घ्यावे लागतात”,असा टोला जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावला.

संबंधित बातम्या : 

मंदिरं उघडण्याची ‘हीच ती वेळ’, सरकार पुढील चार वर्ष दिवाळी साजरी करणार : जयंत पाटील

राज्यपालांविषयी महाविकासआघाडीचे मत दुराग्रही, अधिकारात, नियमात जे असेल तेच राज्यपाल करतील : प्रवीण दरेकर

(Ramdas Athawale criticize Thackeray govt for delay in temple reopening )

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.