AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास आठवलेंचा आरपीआय उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार, दलित मतांवर फक्त मायावतींचा अधिकार नाही असे सांगत घोषणा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त 18 किंवा 8-10 जागा मिळाल्या तर भाजपसोबत युती करु, असं सांगितलं आहे. तसेच आगामी काळात उत्तर प्रदेशात एक लाख लोकांचं संमेलन घेणार असंदेखील जाहीर केलं आहे.

रामदास आठवलेंचा आरपीआय उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार, दलित मतांवर फक्त मायावतींचा अधिकार नाही असे सांगत घोषणा
RAMDAS ATHAWALE
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 9:18 PM
Share

नागपूर : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त 18 किंवा 8-10 जागा मिळाल्या तर भाजपसोबत युती करु, असं सांगितलं आहे. तसेच आगामी काळात उत्तर प्रदेशात एक लाख लोकांचं संमेलन घेणार असंदेखील जाहीर केलं आहे.

यूपीतील दलित मतांवर फक्त मायावती यांचा अधिकार नाही

रामदास आठवले आज नागपुरात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले गट) आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आरपीआय उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाग घेईल. यूपीतील दलित मतांवर फक्त मायावती यांचा अधिकार नाही. आम्ही यूपीमध्ये आगामी काळात एक लाख लोकांचं संमेलन घेणार आहोत, असं सांगितलं. तसेच उत्तर प्रदेशात बाह्मण समाजाचेही संमेलन घेऊ, असेही आठवले म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणा निष्पक्ष आहेत

पुढे बोलताना त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणेवर दावखण्यात येणाऱ्या अविश्वासावरही भाष्य केलं. त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा या निष्पक्ष आहेत. काही शंका असल्यास तपास यंत्रणा चौकशी करतात. आम्ही छापा टाकून काटा काढत नाही. काटा टाकून छापा टाकतो, असे भाष्य आठवले यांनी केलं.

उद्धव ठाकरे यांनी अडीच-अडीच वर्षांचा विचार करावा

तसेच पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार आणि सत्तेचे गणित यावर मत व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी अडीच-अडीच वर्षांचा विचार करावा. अडीच वर्षे ते मुख्यमंत्री राहणार आणि अडीच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपद सांभाळतील. सेना भाजपत समन्वय करायला मी तयार आहे. पण यांना समन्वय करायचा नाही, असे रामदास आठवले म्हणाले.

महाराष्ट्राचा बंगाल केला तर आम्ही बंगालचा महाराष्ट्र करु

तसेच आगामी महापालिका निवडणुकीवर बोलताना अनेक शिवसैनिक नाराज आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत निवडणूक लढणार आहे, असे आठवले यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा बंगाल केला तर आम्ही बंगालचा महाराष्ट्र करु अशी मिश्किल टिप्पणी केली.

इतर बातम्या :

चालत्या कारची स्टेअरिंग अचानक लॉक झाली आणि महिला डॉक्टरने जीव गमावला, नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री?

आता अजित पवार मुख्यमंत्री होतील म्हणून त्यांना त्रास दिला जातोय का? चर्चेतला सवाल पवारांनी रोखठोक निकाली काढला

शरद पवार म्हणाले ठाकरेंचा हात सक्तीने वर केला, “साहेब ! किती हा भाबडेपणा” म्हणत फडणवीसांनी उडवली खिल्ली

(ramdas athawale rpi party going to contest uttar pradesh election)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.