AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटाचे आमदार फोडणार काय?; रावसाहेब दानवे यांचं खास स्टाईलमध्ये एका वाक्यात उत्तर

भारतीय जनता पक्ष कोणत्याही राजकीय पक्ष फोडणार नाही. शिवसेनेने आम्हाला धोका दिला. पण आम्ही त्यांचेही आमदार फोडले नाही. शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली.

शिंदे गटाचे आमदार फोडणार काय?; रावसाहेब दानवे यांचं खास स्टाईलमध्ये एका वाक्यात उत्तर
शिंदे गटाचे आमदार फोडणार काय?; रावसाहेब दानवे यांचं खास स्टाईलमध्ये एका वाक्यात उत्तरImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2022 | 12:15 PM
Share

जालना: केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) गेल्या काही दिवसांपासून बरेच फॉर्मात आहेत. दानवे यांची गेल्या काही दिवसांपासून जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. प्रत्येक राजकीय प्रश्नांवर दानवे यांची फटकेबाजी सुरू असते. मग कोणताही प्रश्न असो दानवे यांचं उत्तर तयारच असतं. आजही त्यांना असाच एक अडचणीचा प्रश्न विचारण्यात आला. शिंदे गटाच्या (shinde camp) संदर्भातील प्रश्न त्यांना विचारण्यात आला. पण या प्रश्नावर उत्तर देणार नाहीत ते रावसाहेब दानवे कसले? त्यांनीही आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. त्यामुळे पत्रकारांना (media) उत्तर तर मिळालंच, पण म्हणावी तशी बातमी मिळाली नाही.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना भाजप शिंदे गटाचे आमदार फोडणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर दानवे यांनी शांतपणे उत्तर दिलं. भाजप शिंदे गटाचा एकही आमदार फोडणार नाही. कारण आम्ही एकत्र आहोत, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. आम्ही एकत्र आहोत म्हणून आमदारा फोडणार नाही, असं विधान केल्याने पत्रकारांच्याही भुवया उंचावल्या गेल्या.

भारतीय जनता पक्ष कोणत्याही राजकीय पक्ष फोडणार नाही. शिवसेनेने आम्हाला धोका दिला. पण आम्ही त्यांचेही आमदार फोडले नाही. शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली. आम्ही शिवसेनेला पाडले नाही. परंतु त्यांच्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे ते पडले, असं त्यांनी सांगितलं.

विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यावरही दानवे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढली. त्यांच्याकडे संख्याबळ आले अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यांच्याकडे संख्याबळ आहे, असं ते म्हणाले.

अर्जुन खोतकर आणि माझ्यामधील कटुता संपली आहे. मीडियाने आमच्यात आता भांडणे लावू नये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत. कारण त्यांना अस्तित्व टिकवायचे आहे, असं त्यांनी सांगितलं.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. नुकसानीचा आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन मदत केली जाणार आहे. त्याबाबत केंद्राला कळवले जाईल आणि शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

गुलाबराव पाटील आणि चिमणराव पाटील तसेच रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये जो वाद होत आहे, त्या संदर्भात मी त्यांना फोन करणार आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन तुमच्याशी बोलेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.